देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: आई- बाबामधील सुंदर नाते, मुलांचे समाधानी जीवन घडविते!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > संपादकीय > लेख > आई- बाबामधील सुंदर नाते, मुलांचे समाधानी जीवन घडविते!
संपादकीयलेख

आई- बाबामधील सुंदर नाते, मुलांचे समाधानी जीवन घडविते!

Deshonnati Digital
Last updated: 2024/05/18 at 5:33 PM
By Deshonnati Digital Published May 18, 2024
Share

मुलांना आयुष्यातील पहिली आणि सर्वात प्रभावी शिकवण त्यांच्या घरातून म्हणजेच पालकांकडून मिळते. आई- वडिलांचे आंतरव्यक्तिक नाते, त्यांचा संवाद, आणि त्यांच्या नात्यातील गुण- दोष मुलांच्या मनावर खोलवर परिणाम करतात. मुलांच्या भावनिक विकासात आई- वडिलांच्या नात्याची भूमिका महत्त्वपूर्ण असते, कारण याच नात्याच्या माध्यमातून मुले प्रेम, आदर, संवाद, आणि सहकार्य शिकतात.

समुपदेशनासाठी येणार्‍या बहुतेक प्रकरणांमध्ये संबंधित व्यक्तीच्या वर्तमान समस्यांचे मूळ हे तिच्या बालपणातच असलेले दिसून येते. आपला दृष्टीकोन आणि प्रतिक्रिया या अत्यंत महत्त्वाच्या दोन गोष्टी प्रामुख्याने कानावर पडणार्‍या संवादातून आणि अगदी छोट्या छोट्या वर्तनातून विकसित होतात. अत्यंत महत्त्वाचे म्हणजे कुटुंबातील सदस्यांचे परस्परांशी नाते व व्यवहार यांतून मुख्यत्वे व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होते. मागील काही वर्षांत केलेल्या प्रत्यक्ष निरीक्षण आणि सखोल अभ्यासातून हे लक्षात आले आहे, की मनुष्याच्या जीवनातील मानसिक व भावनिक उलथापालथ ही बालपणात मनावर झालेल्या परिणामांचा परिणाम आहे. विशेषतः आई आणि बाबा यांच्या नात्यामध्ये जितके जास्त प्रश्न तितक्या अधिक समस्या पुढील जीवनात मुलांना उद्भवतात. असे लक्षात येते, की मुलांच्या जडणघडणीवर सर्वाधिक चांगला किंवा अत्यंत वाईट परिणाम हा कशाचा होत असेल, तर तो आई-वडिलांच्या परस्पर संबंधाचा! आई-वडिलांचे नाते जितके निकोप व समंजस तितका मुलांचा आत्मविश्वास व जीवनातील आनंद अधिक. दोघांमध्ये जेवढे वादविवाद तेवढे प्रश्न मुलांच्या व्यक्तिमत्त्वात! म्हणून मुलांचे जीवन समृद्ध व आनंदी असावे असे जर वाटत असेल, तर पालकांच्या परस्पर संबंधांवर काम केले पाहिजे.

मुलांना आयुष्यातील पहिली आणि सर्वात प्रभावी शिकवण त्यांच्या घरातून म्हणजेच पालकांकडून मिळते. आई- वडिलांचे आंतरव्यक्तिक नाते, त्यांचा संवाद, आणि त्यांच्या नात्यातील गुण- दोष मुलांच्या मनावर खोलवर परिणाम करतात. मुलांच्या भावनिक विकासात आई- वडिलांच्या नात्याची भूमिका महत्त्वपूर्ण असते, कारण याच नात्याच्या माध्यमातून मुले प्रेम, आदर, संवाद, आणि सहकार्य शिकतात. आई- वडिलांचे आंतरव्यक्तिक नाते हे मुलांसाठी आदर्श असते. आई- वडिलांमध्ये जर प्रेम, आदर, आणि विश्वास असेल, तर मुलांना सकारात्मक संदेश मिळतो. त्यांना असे वाटते की, कोणत्याही समस्येचा सामना एकत्रितपणे करू शकतो. यामुळे मुलांमध्ये आत्मविश्वास वाढतो आणि त्यांना जीवनातल्या अडचणींना धैर्याने तोंड देण्याची क्षमता विकसित होते. पालकांमधील संवाद हा मुलांच्या भावनिक विकासातला महत्त्वाचा घटक आहे. जर आई- वडील आपापसात उघडपणे आणि आदराने संवाद साधत असतील, तर मुलांना संवादाचे महत्त्व कळते. यामुळे त्यांना त्यांच्या भावना मोकळेपणाने व्यक्त करण्याची सवय लागते. तसेच, मुले इतरांशी संवाद साधताना खुल्या आणि सकारात्मक दृष्टीकोनाने वागतात.

आई- वडिलांमधील सततचे संघर्ष आणि तणाव मुलांच्या मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम करू शकतात. घरातले वादविवाद, चिडचिड, आणि तणावाचे वातावरण मुलांच्या मनावर भीती आणि असुरक्षिततेचे सावट पाडते. अशा परिस्थितीत मुले स्वत:ला दोष देऊ लागतात आणि त्यांच्या आत्मसन्मानात घट होते. दीर्घकालीन तणाव मुलांमध्ये चिंता, नैराश्य, आणि भावनिक अस्थिरता निर्माण करू शकतो. आई- वडिलांमध्ये जर सकारात्मक नातेसंबंध असेल, तर त्याचा मुलांवर सकारात्मक प्रभाव पडतो. मुलांना एक आदर्श वातावरण मिळते, जिथे ते प्रेम, सन्मान, आणि समंजसपणाचे धडे शिकतात. अशा वातावरणात वाढलेल्या मुलांमध्ये सामाजिक कौशल्ये, सहकार्य, आणि समस्यांवर सोडवणूक करण्याच्या क्षमता अधिक चांगल्या प्रकारे विकसित होतात. तसेच, त्यांच्यातील आत्मविश्वास, आत्मसन्मान, आणि आत्मनिर्भरता वाढते. मुलांचे बालपण त्यांच्या संपूर्ण आयुष्यावर परिणाम करते. आई- वडिलांच्या आंतरव्यक्तिक नात्याचा परिणाम मुलांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यावरही होतो. बालपणातल्या सकारात्मक अनुभवामुळे मुले जीवनात अधिक समाधानी आणि यशस्वी होतात, तर नकारात्मक अनुभवामुळे त्यांच्यात भावनिक अस्थिरता, आत्मविश्वासाचा अभाव, आणि वैयक्तिक नात्यात समस्या निर्माण होऊ शकतात.

म्हणूनच मुलांचे चांगले व्हावे असे वाटत असेल, तर सर्वप्रथम आई व बाबा दोघांनीही एकमेकांच्या संबंधांवर काम केले पाहिजे. गरज असल्यास जाणकारांची मदत घेतली पाहिजे. पालकांच्या वादविवादामुळे आणि एकमेकांच्या कटुतेमुळे मुलांचे जेवढे नुकसान होते तेवढे अन्य कशानेही होत नाही. पालकांनी मुलांना देण्यासारखी जर काही एक गोष्ट असेल, तर ती आहे पती-पत्नी म्हणून एकमेकांवरील विश्वास, आदर आणि प्रेम यांचा अनुभव! मुलांना घरातील नात्यांचा हा सुंदर अनुभव मिळाला, की मुले बाकी गोष्टी आपोआप मिळवितात. या बाकी गोष्टींमध्ये सर्वात महत्त्वाच्या गोष्टी असतात, आत्मविश्वास, सकारात्मक दृष्टीकोन, स्व:चा आदर आणि जीवनाविषयी कुतूहल.. घरातील वातावरण आनंदी असेल, तर जीवनात कितीही संकटे आली, दुःख आले तरी आपली मुले त्यातून सहीसलामत तरून जातील. म्हणून त्यांना काही द्यायचेच असेल, तर देऊ या ‘एकमेकांचा आदर करणारे व काळजी घेणारे पती-पत्नी’ या गोड अनुभवाची शिदोरी!

मनोज गोविंदवार

  ८८३०४७८७३५
manojgovindwar@gmail.com
पालक समुपदेशक, जळगाव

You Might Also Like

Farmer Debt Relief: ‘किसान ब्रिगेड’चे…पाऊल कर्जमुक्तीकडे!

World Earth Day: जंगले नाहीशी होत आहेत, हिमनद्या फुटत आहेत…प्रजाती देखील धोक्यात!

Civil Service Day: ‘आजचा निर्णय ठरवणार, हजार वर्षांचे भविष्य’- PM मोदी

World Homeopathy Day: भारतातील ‘हा’ एकमात्र आरोग्यसेवेचा आधारस्तंभ!

Farmers Loans: वाट्टेल ती झक मारा, मात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी करा…

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Holi 2025
Breaking Newsअध्यात्मदिल्लीदेश

Holi 2025: तब्बल 64 वर्षांनंतर होळी आणि रमजान एकत्र?

Deshonnati Digital Deshonnati Digital March 13, 2025
Latur : कामरावर गुन्हा दाखल करण्यासाठी लातूरमध्ये शिवसेनेची पोलिसात तक्रार
Hingoli Assembly Election: हिंगोली जिल्ह्यात 53 उमेदवार निवडणूक रिंगणात 
MLA Gutte: आ. गुट्टे यांच्या विरोधातील उपोषणार्थीची तब्येत खालावली; प्रशासन दखल घेणार का?
लोकांना इंग्रजी बोलायला शिकवणारी “अडाणी शिक्षिका”
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Farmer Debt ReliefFarmer Debt Relief
विदर्भबुलडाणामहाराष्ट्रलेखशेती

Farmer Debt Relief: ‘किसान ब्रिगेड’चे…पाऊल कर्जमुक्तीकडे!

June 10, 2025
World Earth Day
लेखदिल्लीदेश

World Earth Day: जंगले नाहीशी होत आहेत, हिमनद्या फुटत आहेत…प्रजाती देखील धोक्यात!

April 22, 2025
Civil Service Day
देशराजकारणलेखविदेश

Civil Service Day: ‘आजचा निर्णय ठरवणार, हजार वर्षांचे भविष्य’- PM मोदी

April 21, 2025
World Homeopathy Day
देशBreaking Newsआरोग्यलेखविदेश

World Homeopathy Day: भारतातील ‘हा’ एकमात्र आरोग्यसेवेचा आधारस्तंभ!

April 10, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?