देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: उसाच्या पाचटापासून तयार केलेल्या कंपोस्टचे फायदे
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
शेती

उसाच्या पाचटापासून तयार केलेल्या कंपोस्टचे फायदे

Deshonnati Digital
Last updated: 2024/05/10 at 12:06 PM
By Deshonnati Digital Published May 10, 2024
Share

पिकाच्या जोमदार वाढीसाठी भरपूर उत्पादनासाठी रासायनिक व सेंद्रिय खतांचा संतुलित वापर करणे फायदेशीर ठरते. रासायनिक खतांची मर्यादा व सेंद्रिय खतांचे फायदे लक्षात घेता पिकास निव्वळ रासायनिक खते न देता त्याबरोबर आपल्याच शेतात तयार होणारे सेंद्रिय खत देणे ही एक शास्त्रीय तशीच काळाची गरज आहे. अलीकडे बागायती क्षेत्र वाढल्यामुळे रासायनिक खतांचा वापर भरपूर वाढला आहे. दिवसेंदिवस शेणखत व कंपोस्ट खते यांची कमतरता भासू लागली आहे. हिरवळीचे पीक घेऊनही काही प्रमाणात सेंद्रिय खतांची उणीव भरून काढण्यात येते; परंतु हिरवळीचे पीक घेऊन ते जमिनीत गाडण्यातही हिरवळीचे खत होण्यासाठी रानाची उपलब्धता, हिरवळीचे पीक व नंतर घ्यावयाचे पीक यासाठी पुरेसा वेळ हवा व हिरवळीचे खत जमिनीत कुजण्यासाठी पुरेसा ओलावा असावा लागतो. शेतामध्ये गवत, पाला पाचोळा, ज्वारी व मका या पिकांची धसकटे, जनावरांचे मलमूत्र, गव्हाचे व साळीचे काड, तसेच उसाचे पाचट सेंद्रिय पदार्थ मुबलक प्रमाणात उपलब्ध होतात. या सेंद्रिय पदार्थांपैकी काही पदार्थ लवकर कुजतात; परंतु उसाचे पाचट लवकर कुजत नाही त्यामुळे शेतात वापरता येत नाही. अलीकडे संशोधनानुसार उसाचे पाचट लवकर कुजण्यासाठी व त्यापासून कंपोस्ट खत तयार करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित झाले आहे.

जमिनीत कोणतेही सेंद्रिय खत न देता हेक्टरी आठ ते दहा टन मिळणारे पाचट मिळते. ऊस तुटल्यावर उसाचे पाचट जाळून न टाकता यापासून कंपोस्ट केले किंवा जागच्या जागी कुजविले तर जमिनीस बहुमोल असे सेंद्रिय खत मिळू शकेल. शेतातील ऊस तोडून गेल्यानंतर जी वाळलेली पाने शेतात पडतात त्यास पाचट असे म्हणतात. पाचटामध्ये लिग्निन व मेनचट पदार्थांचे प्रमाण १५ टक्के असते. पाचटावर टोकदार केसासारखे कुसे असल्यामुळे जनावरे पाचट खात नाहीत. पाचटामध्ये ऊर्जा निर्मितीक्षमता कमी असते. शिवाय पाचट लवकर भरभर जळून राख होते. त्यामुळे पाचटाचा उपयोग जळण्यासाठी करता येत नाही. सर्वसाधारणपणे एक हेक्टर क्षेत्रापासून आठ ते दहा टन पाचट उपलब्ध होते व त्यापासून चार ते पाच टन सेंद्रिय खत मिळते.

पाचटाचे फायदे:
१) वेगळे सेंद्रिय खत घालण्याची गरज नाही, पाचटाद्वारे हेक्टरी चार ते पाच टन सेंद्रिय खत तयार होते. २) पाचट आच्छादनासारखे काम करते त्यामुळे पाण्याची बचत होते. ३) पाचट टाकलेल्या शेतात गांडूळ ठेवले असता गांडुळांची संख्या व कार्य चांगले होते. ४) पाचटामुळे तणांची वाढ होत नाही. ५) उन्हाळ्यात जमिनीचे तापमान कमी ठेवण्यात पाचटाचा उपयोग होतो, तर पावसाळ्यात तणांचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होते. ६) द्राक्षामध्ये एप्रिल छाटणीनंतर उसाच्या पाचटाचा आच्छादन वापर केला तर पाण्याची बचत होते व द्राक्षाच्या कांड्यांमध्ये फळधारण्याचे प्रमाण वाढते. ७) बहार धरल्यानंतर डाळिंबाच्या आणि बोरीच्या झाडाखाली अळ्यात आणि अळ्याबाहेर उसाच्या पाचटाचा आच्छादन म्हणून वापर केल्यास डाळिंबातील फळ तडकणे टाळता येते, तसेच बोरातील पाण्याअभावी होणारी फळगळ कमी करता येते.

पाचट जाळल्यामुळे होणारे तोटे:
१) पाचट जाळल्यामुळे आपण निसर्गाने दिलेल्या सेंद्रिय पदार्थाचा साठा जाळून टाकून मुख्यत्वे सेंद्रिय कर्बाचा आणि नत्राचा नाश करतो. उसाच्या हेक्टरी आठ ते दहा टन पाचट मिळते. २) पाचट जाळल्यामुळे त्यातील शंभर टक्के नत्र वाया जाते आणि स्फुरद, मॅग्नेशियम, कॅल्शियम, पोटॅशियम, सोडियम आणि झिंक ७५ टक्के वाया जातात. ३) जमीन तापल्यामुळे जमिनीतील नत्र, यात्रा आणि इतर अन्न घटकांचा थोडाफार प्रमाणात वायुरूपात नाश होतो. ४) जमीन भाजल्याने जमिनीच्या वरच्या थरातील उपयुक्त जिवाणूंची संख्या कमी होते.

 

प्रा. संजय बाबासाहेब बडे,
साहाय्यक प्राध्यापक
कृषी विद्या विभाग: दादासाहेब पाटील कृषी महाविद्यालय
दहेगाव, तालुका वैजापूर, जि. छत्रपती संभाजी नगर

You Might Also Like

Rabi Sowing Season: निसर्गाने सोडली साथ, शासनाचा आखडता हात तरी रब्बी पेरणीची घाई

Farmer Death Body: आष्टी येथील शेतकर्‍याचा मृतदेह विहिरीत आढळला

Paddy Registration: पोर्टल बंद झाल्यामुळे शेकडो शेतकरी धान नोंदणीपासून वंचित

Fertilizer Rates Rise: रासायनिक खतांचे दर पुन्हा वाढले; ‘लिंकिंग’च्या मार्‍याने शेतकरी हतबल

Kharif Marketing season: खरीप पणन हंगाम २०२५-२६ मध्ये जिल्ह्यातील १७८ धान खरेदी केंद्रांना मंजुरी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
School Management Samiti
मराठवाडाहिंगोली

School Management Samiti: अखेर मुदत संपलेल्या शाळा व्यवस्थापन समित्या १५ नोव्हेंबर पर्यंत तयार करण्याचे निर्देश

admin1 admin1 November 9, 2025
Soybean Price: ‘क्रांतिकारी’चे नेते असे का वागू लागले!
Gadchiroli : सतीनदीच्या रपट्यावर पाणी, कुरखेडा – कोरची मार्ग बंद
Holi celebration: अमरावतीत दृष्टिहीन दिव्यांग बांधवांसोबत अनोखे ‘इको-फ्रेंडली धूलिवंदन’
Gadchiroli : विसर्ग वाढला, नद्या फुुगल्या, पुराचा धोका कायम
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Rabi Sowing Season
विदर्भभंडाराशेती

Rabi Sowing Season: निसर्गाने सोडली साथ, शासनाचा आखडता हात तरी रब्बी पेरणीची घाई

November 18, 2025
Bollywood Sholay Re-Released- तब्बल, 50 वर्षांनंतर पडद्यावर पाहायला मिळणार 'ठाकूर आणि डाकू गब्बर सिंग' यांच्यातील संघर्ष!
विदर्भभंडाराशेती

Farmer Death Body: आष्टी येथील शेतकर्‍याचा मृतदेह विहिरीत आढळला

November 17, 2025
Paddy Registration
विदर्भभंडाराशेती

Paddy Registration: पोर्टल बंद झाल्यामुळे शेकडो शेतकरी धान नोंदणीपासून वंचित

November 17, 2025
Fertilizer Rates Rise
विदर्भयवतमाळशेती

Fertilizer Rates Rise: रासायनिक खतांचे दर पुन्हा वाढले; ‘लिंकिंग’च्या मार्‍याने शेतकरी हतबल

November 16, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?