देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: ‘जरुरी है… !’
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > संपादकीय > लेख > ‘जरुरी है… !’
संपादकीयलेख

‘जरुरी है… !’

Deshonnati Digital
Last updated: 2024/05/10 at 12:13 PM
By Deshonnati Digital Published May 10, 2024
Share

माणसाजवळ सगळं काही असलं तरी त्याला जगताना प्रेम आणि सन्मानाची गरज असतेच की नाही? यासाठी काही निवडक व्यक्तींशी चांगले संबंध असणे आवश्यकच असतात जे माणसाच्या मनात काही साचू देत नाहीत, तर मन मोकळं करण्यासाठी मदतच करतात. यासाठी कोणत्याही स्थितीत माणसांना जाणण्याचा प्रयत्न करण्याची सवय म्हणा की वृत्ती असणं जरुरी आहेच. अन्यथा माणसाला सगळ््याच बर्‍या-वाईट क्षणांना एकट्यानेच सहन करावं लागतं. मग अशा माणसांना माणसांची हवी तशी सोबत लाभत नाही, पण अखेर वेळ तर सांभाळावी लागते.

माणसाजवळ सगळं काही असलं तरी त्याला जगताना प्रेम आणि सन्मानाची गरज असतेच की नाही? यासाठी काही निवडक व्यक्तींशी चांगले संबंध असणे आवश्यकच असतात जे माणसाच्या मनात काही साचू देत नाहीत, तर मन मोकळं करण्यासाठी मदतच करतात. यासाठी कोणत्याही स्थितीत माणसांना जाणण्याचा प्रयत्न करण्याची सवय म्हणा की वृत्ती असणं जरुरी आहेच. अन्यथा माणसाला सगळ््याच बर्‍या-वाईट क्षणांना एकट्यानेच सहन करावं लागतं. मग अशा माणसांना माणसांची हवी तशी सोबत लाभत नाही, पण अखेर वेळ तर सांभाळावी लागते….. एक माणूस आठवतो. कुणाला वाटेल तो फक्त व्यावहारिक आहे, पण नाही; तो शक्यतो नियमाने चालणारा आणि माणुसकी जपणारा आहे. कधी कधी तो हिंदीत बोलायचा. तो म्हणत असे – ‘प्रेम आणि व्यवहाराच्या खोल्या तशा वेगळ्या ठेवल्या तर जास्त चांगलं राहतं. जिथे व्यवहार आहे तिथे प्रेम अपेक्षित नाही आणि जिथे प्रेम आहे तिथे व्यवहार असलाच पाहिजे, असेही नाही. मात्र, कधी-कधी तो असू शकतो. त्याचं प्रमाण मात्र ज्याने-त्याने ठरवायचं असतं. व्यवहार व्यवहाराच्या ठिकाणी अन् प्रेम प्रेमाचे ठिकाणी असावं, असं तो मानत असे. यासाठी तो हिंदी सिनेमातल्या एका प्रसंगाचे उदाहरण नेहमी देत असे. तो म्हणायचा- शोले सिनेमा पाहिलाय का? बसंती ‘शोले’ मध्ये म्हणाली होती – ‘घोडा अगर घांस से दोस्ती करेगा तो, खायेगा क्या! मग काही ठिकाणी कमी का असेना, पण पैसे घ्यायला काय हरकत.

माणसाला आवडो की ना आवडो, काही गोष्टी या कराव्याच लागतात, केल्याच पाहिजेत कारण त्या जरुरी असतात. खरं म्हणजे एखादी गोष्ट जरुरी आहे, म्हणजेच आवश्यक आहे, ती कशी निर्माण होते तर गरजेतून निर्माण होते. गरज कोणाला नसते प्रत्येकाला असते. त्यामुळे ज्याची गरज आहे ते आठवले म्हणजे माणूस ते करायला तयार होतो. मग एखादी वस्तू विकत आणणे, कुणाला तरी फोन करणे, कोणाची तरी आठवण काढणे आणि एखादं काम हाती घेणे किंवा भविष्याची एखादी योजना आखणे, वगैरे माणूस करतो ते त्याच्या गरजेपोटी करत असतो. मग अमुक एखाद्या गरजेपोटी कुणाची कुणी आठवण काढली तर कुणाला वाईट वाटण्याचं कारण ते काय? तहान खूप लागली म्हणजे पाण्याची आठवण माणसाला येते. हे काय नवीन आहे आणि त्यात कोणी पाण्याची मागणी केली किंवा तसा प्रयत्न केला तर त्यात वावगं ते काय?तरुणांनी त्यांच्या करियरची एक निश्चित दिशा निवडणे, प्रसंगी त्यात बदल करणेही जरुरी असतेच की नाही. व्यवहाराची-व्यवसायाची नेमकी दिशा अन् विचार असणे जरुरी आहेच ना! कोणत्याही निवडणुकीमध्ये जाणीवपूर्वक योग्य उमेदवार निवडणं गरजेचं असतं, यात शंकाच नाही.
माणसाजवळ सगळं काही असलं तरी त्याला जगताना प्रेम आणि सन्मानाची गरज असतेच की नाही? यासाठी काही निवडक व्यक्तींशी चांगले संबंध असणे आवश्यकच असतात जे माणसाच्या मनात काही साचू देत नाहीत, तर मन मोकळं करण्यासाठी मदतच करतात. यासाठी कोणत्याही स्थितीत माणसांना जाणण्याचा प्रयत्न करण्याची सवय म्हणा की वृत्ती असणं जरुरी आहेच.

अन्यथा माणसाला सगळ््याच बर्‍या-वाईट क्षणांना एकट्यानेच सहन करावं लागतं. मग अशा माणसांना माणसांची हवी तशी सोबत लाभत नाही, पण अखेर वेळ तर सांभाळावी लागते. अशीच काहीशी भावना व्यक्त करताना प्रख्यात शायर मिर्झा गालिब म्हणतात-
मैं उस रास्ते पर भी
अकेले चला हूँ,
जहाँ मुझे किसी की
सख्त जरुरत थी!
प्रत्येकाला दुसर्‍या माणसाची कुठेतरी गरज असतेच, कारण त्याशिवाय आनंद अन् समाधान कसे मिळणार! एकदा असंच झालं. एका गावातील लोक एका संताकडे आले अन् म्हणाले, ‘ महाराज गावातील विहिरीचे पाणी पिण्यासाठी योग्य नाही, कारण त्यातून दुर्गंधी खूप येत आहे. गावातील काही प्राणी भांडत-भांडत या विहिरीत पडले तेव्हापासून या पाण्याचा घाण वास येतोय. काही उपाय सांगा….’ संत म्हणाले, ‘पाण्यात सुगंधी द्रव्य टाका, नाहीतर गावात कोणत्याही देवाची कथा करा, जमलंच नाही तर पाण्यामध्ये पवित्र पाणी टाकून पाहा.’ लोकांनी सगळं केलं, मात्र पाण्याचा घाण वास काही गेला नाही. त्यावेळी पुन्हा ते संताकडे आले आणि विचारलं. त्यावेळेला संत म्हणाले- ‘विहिरीतून मेलेले प्राणी बाहेर काढलेत का, ते काढल्याशिवाय पाण्याची दुर्गंधी जाणार कशी? ‘लोकांच्या लक्षात आलं. विहिरीतून हा कचरा आणि मेलेले प्राणी काढले म्हणजे पाणी आपोआप शुद्ध होईल आणि पिण्यालायक होईल. माणसाच्या जीवनाचं असंच करणं जरुरी आहे म्हणजे ते अधिक जगण्यालायक होऊनच जाईल यात शंकाच ती काय?

प्रा.डॉ.मोहन खडसे
९८२३२८९०१०
(प्रस्तुत लेखक हे प्रसिद्ध स्तंभ लेखक, शिक्षण तज्ज्ञ असून
त्यांच्या ‘सावित्री फाऊंडेशन, अकोला’ च्या माध्यमातून सक्रिय सामाजिक,
शैक्षणिक कार्य करतात) अकोला
ईमेल: mvkhadse9@gmail.com

 

You Might Also Like

World Earth Day: जंगले नाहीशी होत आहेत, हिमनद्या फुटत आहेत…प्रजाती देखील धोक्यात!

Civil Service Day: ‘आजचा निर्णय ठरवणार, हजार वर्षांचे भविष्य’- PM मोदी

World Homeopathy Day: भारतातील ‘हा’ एकमात्र आरोग्यसेवेचा आधारस्तंभ!

Farmers Loans: वाट्टेल ती झक मारा, मात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी करा…

Shahid Divas: जेव्हा राजगुरू, सुखदेव आणि भगतसिंग यांनी देशासाठी आपले प्राण दिले..!

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Dr. RamRao Maharaj
अध्यात्मवाशिमविदर्भ

Dr. RamRao Maharaj: वापटा येथे तपस्वी संत डॉ. रामराव महाराजांच्या मूर्तीची स्थापना

Deshonnati Digital Deshonnati Digital September 17, 2024
Nana Patekar : ‘अभिनेता नसतो तर अंडरवर्ल्डमध्ये असतो’ – नाना पाटेकर
Raj Thackeray News : राज ठाकरे यांनी मराठी माणुसकीला एकतेचे आवाहन केले, म्हणाले – मराठी माणसं इतके गोंधळलेले मी कधीही पाहिले नाही..!
Yawatmal accident : सदोष दुभाजकावर सलग दुसर्‍या दिवशी अपघात
उज्ज्वल निकमांच्या सरकारी वकीलपदाच्या नियुक्तीस काँग्रेसचा विरोध
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

World Earth Day
लेखदिल्लीदेश

World Earth Day: जंगले नाहीशी होत आहेत, हिमनद्या फुटत आहेत…प्रजाती देखील धोक्यात!

April 22, 2025
Civil Service Day
देशराजकारणलेखविदेश

Civil Service Day: ‘आजचा निर्णय ठरवणार, हजार वर्षांचे भविष्य’- PM मोदी

April 21, 2025
World Homeopathy Day
देशBreaking Newsआरोग्यलेखविदेश

World Homeopathy Day: भारतातील ‘हा’ एकमात्र आरोग्यसेवेचा आधारस्तंभ!

April 10, 2025
Farmers Loans
विदर्भप्रहारमहाराष्ट्रशेतीशेती(बाजारभाव)

Farmers Loans: वाट्टेल ती झक मारा, मात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी करा…

April 6, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?