माणसाजवळ सगळं काही असलं तरी त्याला जगताना प्रेम आणि सन्मानाची गरज असतेच की नाही? यासाठी काही निवडक व्यक्तींशी चांगले संबंध असणे आवश्यकच असतात जे माणसाच्या मनात काही साचू देत नाहीत, तर मन मोकळं करण्यासाठी मदतच करतात. यासाठी कोणत्याही स्थितीत माणसांना जाणण्याचा प्रयत्न करण्याची सवय म्हणा की वृत्ती असणं जरुरी आहेच. अन्यथा माणसाला सगळ््याच बर्या-वाईट क्षणांना एकट्यानेच सहन करावं लागतं. मग अशा माणसांना माणसांची हवी तशी सोबत लाभत नाही, पण अखेर वेळ तर सांभाळावी लागते.
माणसाजवळ सगळं काही असलं तरी त्याला जगताना प्रेम आणि सन्मानाची गरज असतेच की नाही? यासाठी काही निवडक व्यक्तींशी चांगले संबंध असणे आवश्यकच असतात जे माणसाच्या मनात काही साचू देत नाहीत, तर मन मोकळं करण्यासाठी मदतच करतात. यासाठी कोणत्याही स्थितीत माणसांना जाणण्याचा प्रयत्न करण्याची सवय म्हणा की वृत्ती असणं जरुरी आहेच. अन्यथा माणसाला सगळ््याच बर्या-वाईट क्षणांना एकट्यानेच सहन करावं लागतं. मग अशा माणसांना माणसांची हवी तशी सोबत लाभत नाही, पण अखेर वेळ तर सांभाळावी लागते….. एक माणूस आठवतो. कुणाला वाटेल तो फक्त व्यावहारिक आहे, पण नाही; तो शक्यतो नियमाने चालणारा आणि माणुसकी जपणारा आहे. कधी कधी तो हिंदीत बोलायचा. तो म्हणत असे – ‘प्रेम आणि व्यवहाराच्या खोल्या तशा वेगळ्या ठेवल्या तर जास्त चांगलं राहतं. जिथे व्यवहार आहे तिथे प्रेम अपेक्षित नाही आणि जिथे प्रेम आहे तिथे व्यवहार असलाच पाहिजे, असेही नाही. मात्र, कधी-कधी तो असू शकतो. त्याचं प्रमाण मात्र ज्याने-त्याने ठरवायचं असतं. व्यवहार व्यवहाराच्या ठिकाणी अन् प्रेम प्रेमाचे ठिकाणी असावं, असं तो मानत असे. यासाठी तो हिंदी सिनेमातल्या एका प्रसंगाचे उदाहरण नेहमी देत असे. तो म्हणायचा- शोले सिनेमा पाहिलाय का? बसंती ‘शोले’ मध्ये म्हणाली होती – ‘घोडा अगर घांस से दोस्ती करेगा तो, खायेगा क्या! मग काही ठिकाणी कमी का असेना, पण पैसे घ्यायला काय हरकत.
माणसाला आवडो की ना आवडो, काही गोष्टी या कराव्याच लागतात, केल्याच पाहिजेत कारण त्या जरुरी असतात. खरं म्हणजे एखादी गोष्ट जरुरी आहे, म्हणजेच आवश्यक आहे, ती कशी निर्माण होते तर गरजेतून निर्माण होते. गरज कोणाला नसते प्रत्येकाला असते. त्यामुळे ज्याची गरज आहे ते आठवले म्हणजे माणूस ते करायला तयार होतो. मग एखादी वस्तू विकत आणणे, कुणाला तरी फोन करणे, कोणाची तरी आठवण काढणे आणि एखादं काम हाती घेणे किंवा भविष्याची एखादी योजना आखणे, वगैरे माणूस करतो ते त्याच्या गरजेपोटी करत असतो. मग अमुक एखाद्या गरजेपोटी कुणाची कुणी आठवण काढली तर कुणाला वाईट वाटण्याचं कारण ते काय? तहान खूप लागली म्हणजे पाण्याची आठवण माणसाला येते. हे काय नवीन आहे आणि त्यात कोणी पाण्याची मागणी केली किंवा तसा प्रयत्न केला तर त्यात वावगं ते काय?तरुणांनी त्यांच्या करियरची एक निश्चित दिशा निवडणे, प्रसंगी त्यात बदल करणेही जरुरी असतेच की नाही. व्यवहाराची-व्यवसायाची नेमकी दिशा अन् विचार असणे जरुरी आहेच ना! कोणत्याही निवडणुकीमध्ये जाणीवपूर्वक योग्य उमेदवार निवडणं गरजेचं असतं, यात शंकाच नाही.
माणसाजवळ सगळं काही असलं तरी त्याला जगताना प्रेम आणि सन्मानाची गरज असतेच की नाही? यासाठी काही निवडक व्यक्तींशी चांगले संबंध असणे आवश्यकच असतात जे माणसाच्या मनात काही साचू देत नाहीत, तर मन मोकळं करण्यासाठी मदतच करतात. यासाठी कोणत्याही स्थितीत माणसांना जाणण्याचा प्रयत्न करण्याची सवय म्हणा की वृत्ती असणं जरुरी आहेच.
अन्यथा माणसाला सगळ््याच बर्या-वाईट क्षणांना एकट्यानेच सहन करावं लागतं. मग अशा माणसांना माणसांची हवी तशी सोबत लाभत नाही, पण अखेर वेळ तर सांभाळावी लागते. अशीच काहीशी भावना व्यक्त करताना प्रख्यात शायर मिर्झा गालिब म्हणतात-
मैं उस रास्ते पर भी
अकेले चला हूँ,
जहाँ मुझे किसी की
सख्त जरुरत थी!
प्रत्येकाला दुसर्या माणसाची कुठेतरी गरज असतेच, कारण त्याशिवाय आनंद अन् समाधान कसे मिळणार! एकदा असंच झालं. एका गावातील लोक एका संताकडे आले अन् म्हणाले, ‘ महाराज गावातील विहिरीचे पाणी पिण्यासाठी योग्य नाही, कारण त्यातून दुर्गंधी खूप येत आहे. गावातील काही प्राणी भांडत-भांडत या विहिरीत पडले तेव्हापासून या पाण्याचा घाण वास येतोय. काही उपाय सांगा….’ संत म्हणाले, ‘पाण्यात सुगंधी द्रव्य टाका, नाहीतर गावात कोणत्याही देवाची कथा करा, जमलंच नाही तर पाण्यामध्ये पवित्र पाणी टाकून पाहा.’ लोकांनी सगळं केलं, मात्र पाण्याचा घाण वास काही गेला नाही. त्यावेळी पुन्हा ते संताकडे आले आणि विचारलं. त्यावेळेला संत म्हणाले- ‘विहिरीतून मेलेले प्राणी बाहेर काढलेत का, ते काढल्याशिवाय पाण्याची दुर्गंधी जाणार कशी? ‘लोकांच्या लक्षात आलं. विहिरीतून हा कचरा आणि मेलेले प्राणी काढले म्हणजे पाणी आपोआप शुद्ध होईल आणि पिण्यालायक होईल. माणसाच्या जीवनाचं असंच करणं जरुरी आहे म्हणजे ते अधिक जगण्यालायक होऊनच जाईल यात शंकाच ती काय?
प्रा.डॉ.मोहन खडसे
९८२३२८९०१०
(प्रस्तुत लेखक हे प्रसिद्ध स्तंभ लेखक, शिक्षण तज्ज्ञ असून
त्यांच्या ‘सावित्री फाऊंडेशन, अकोला’ च्या माध्यमातून सक्रिय सामाजिक,
शैक्षणिक कार्य करतात) अकोला
ईमेल: mvkhadse9@gmail.com