परभणी (Parbhani) :- जिंतूर तालुक्यातील बोरी पोलीस ठाणे हद्दीतील निवळी ठोंबरे येथील तलावात 19 वर्षीय युवक बुडाला त्यास स्थानिक भुई समाजातील मच्छीमारांनी (Fishermen) तब्बल चार तास शोध घेऊन पाण्यातून मृतदेह (dead body) मृत अवस्थेत बाहेर काढण्यात आला असून घटनास्थळी बोरी पोलीसांनी प्राथमिक पंचनामा करून मृतदेह बोरी ग्रामीण रुग्णालयात हलविल्याची घटना दि.19 एप्रिल रोजी घडली आहे.
बोटीतून तलावातील पाण्यात पडून बुडाल्यामुळे मुलाचा मृत्यू
तालुक्यातील बोरी पोलीस ठाणे हद्दीतील निवळी ठोंबरे येथील घटनास्थळी असलेल्या नागरिकांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की आज दि.19 एप्रिल रोजी सकाळी 7:30 च्या सुमारास तलावात भुई समाजातील कैलास लहिरे मच्छीमार रा.गोगलगाव ता.मानवत जि.परभणी येथील मच्छीमार नेहमी प्रमाणे मासे मारी करण्यासाठी तलावात आपल्या मुला सोबत गेला असता त्यांचा मुलगा विशाल कैलास लहिरे वय 19 बोटीतून तलावातील पाण्यात पडून बुडाला. या घटनेची माहिती वडिलांनी तलावातील भुई समाजातील मच्छीमारांना सांगताच मच्छीमारांनी बोटीच्या मदतीने शोध मोहीम हाती घेतली, पण तो सापडत नसल्याने निवळी ठोंबरे येथील माजी सरपंच रमेश ठोंबरे यांनी घटनेची माहिती बोरी पोलीसांना देताच घटनास्थळी धाव घेत पोलिस जमादार सिध्दार्थ कोकाटे,पो.काॅ.अनिल शिंदे यांनी परभणी येथील आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू पथकाला संपर्क साधला.
मात्र तब्बल चार तास शोध घेत रेस्कू्य पथक येण्या पूर्वीच भुई समाजातील मच्छीमारांनी त्यास पाण्यातून मृतदेह बाहेर काढला घटनास्थळी बोरी पोलीसांनी प्राथमिक पंचनामा करत शवविच्छेदनासाठी बोरी ग्रामीण रुग्णालयात हलविले यावेळी निवळीचे माजी सरपंच रमेशराव ठोंबरे,व ग्रामस्थांनी सहकार्य केले होते. दरम्यान तालुक्यातील येलदरी धरणातील पाण्यात तीन दिवसांपासून एक मच्छीमार बेपत्ता असून तो अद्याप पर्यंत सापडलेला नाही त्यातच आज निवळी तलावात तरुण मुलाचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.