मानोरा (Washim) :- तालुक्यातील मौजे गादेगाव ग्राम पंचायत अंतर्गत येणाऱ्या २५ गरजू गरीब शेतमजूर व्यक्तींची बनावट आधार कार्ड (Aadhar Card) यवतमाळ जिल्हयाचे करून देत कर्ज योजनेतून कर्ज देतो म्हणून ५ हजार रुपये नगदी घेत दारव्हा ( जिल्हा यवतमाळ) येथील आरव बँकेने फसवणूक केली आहे. असे फसवणूक (Fraud) झालेल्या लोकांनी दिलेल्या ग्राम पंचायतला लेखी प्राप्त निवेदनाची दखल घेत ग्राम विकास अधिकारी उल्हास खत्री यांनी तक्रार पोलीस निरीक्षक प्रविण शिंदे यांना पाठविले आहे. या तक्रारीवर पोलीस विभाग काय भूमिका घेते, याकडे फसवणूक झालेल्या पीडितांचे लक्ष लागले आहे.
ग्राम विकास अधिकारी यांची ठाणेदारकडे तक्रार
ठाणेदार यांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, ग्राम पंचायत गादेगाव येथील शेतमजुरी करणाऱ्या नागरिकांना कर्ज देण्याची हमी देवून बनावट आधार कार्ड यवतमाळ जिल्हयाचे करून देण्यात आले. व प्रति लाभार्थी असे एकूण २५ व्यक्तीकडून ५००० रुपये भरणा करून घेतले. त्यानंतर कर्ज दिले नाही. फसवणूक झाल्याचे कळताच ग्राम पंचायतला माहिती देवून सबंधित दोषींवर कायदेशीर कारवाई संदर्भात लेखी निवेदन देण्यात दिल्यावर ग्राम पंचायतचे ग्राम विकास अधिकारी खत्री, सरपंच सौ प्रतिमा लक्ष्मण चव्हाण व उपसरपंच सौ नलिनी रामभाऊ चौधरी यांनी तक्रार ठाणेदार शिंदे याजकडे पत्र पाठवून केली आहे.