Yawatmal :- जिल्ह्यात नऊ मार्किंग फेडरेशनच्या सोयाबीन (Soyabean)हमीभाव केंद्रांवर आतापर्यंत ४ हजार ६०७ क्लिंटल सोयाबीन पिकाची खरेदी करण्यात आली आहे शेतकर्यांना ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी करताना विविध अडचणी येत असल्याने तसेच खाजगी बाजारात सोयाबीनला ४ हजार ५०० प्रती क्विंटल दर मिळाल्याने शेतकरी वर्ग खाजगी बाजाराकडे वळला आहे.
अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकर्यांच्या सोयाबीनला हमीभाव देण्यासाठी राज्य सरकारने (State Govt) यावर्षी १५ नोव्हेंबरपासूनच सोयाबीनची खरेदी सुरू केली आहे. यवतमाळ जिल्ह्यात विदर्भ मार्केटिंग फेडरेशनच्या सात तर महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशनच्या दोन हमीभाव केंद्रांमार्फत सोयाबीन खरेदीला सुरुवात करण्यात आली आहे.
३ लाख १४ हजार ६० शेतकर्यांनी ऑनलाईन पोर्टलद्वारे नोंदणी
या एकूण नऊ केंद्रांवर आतापर्यंत ४ हजार ६०७ क्लिंटल सोयाबीन पिकाची खरेदी करण्यात आली असून जवळपास दोनशे अंशी ऑनलाइन नोंदणीकृत शेतकर्यांनी आपला शेतमाल विक्री केला आहे. तसेच आतापर्यंत ३ लाख १४ हजार ६० शेतकर्यांनी ऑनलाईन पोर्टलद्वारे नोंदणी केली आहे. मात्र शासनाकडून सोयाबीनला ५ हजार ३२८ रुपये हमीभाव मिळाला असला तरीही जिल्ह्यातील या ९ हमीभाव सोयाबीन खरेदी केंद्रावर अजूनपर्यंत शेतकर्यांनी आपला शेतमाल विक्री करण्यासाठी कमी प्रमाणात आणलेला असल्याचे चित्र दिसून येत आहे. परिणामी खासगी बाजारातील सोयाबीनचे ४ हजार ३१५ तर ४ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल भाव वाढले आहेत. यामुळे काही शेतकर्यांनी खाजगी बाजारपेठेत आपला शेतमाल विक्रीला आणला आहे.
शेतकर्यांना आपले सोयाबीन हमीभावाने विक्री करण्यासाठी शासनाच्या ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी करावी लागत आहे. मात्र ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी करताना विविध प्रकारच्या अडचणी जात असल्याच्या तक्रारी शेतकर्यांनी केल्या आहेत. शासनाने ऑफलाइन सरसकट शेतमाल खरेदी करावा अशी ही मागणी शेतकर्यांकडून केली जात आहे.




