Gadchiroli :- जिल्ह्यात सप्टेंबर महिण्यात आलेल्या अतिवृष्टीमुळे(heavy rain) नुकसान झालेल्या ५३२६ शेतकर्यांना नुकसानभरपाई देण्याचा निर्णय शासनाने घेतला असून या अंतर्गत जिल्ह्यातील १०४८.८३ हेक्टर क्षेत्रातील बाधीत पिकाकरीता २६७.५४ लाख रूपयांचा निधी वितरीत करण्यास मान्यता प्रदान करण्यात आली आहे. अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकर्यांना निविष्ठा अनुदान स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते. तसेच, राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विहित दराने मदत्त देण्यात येते.
शासनाच्यावतीने २६७.५४ लाखांचा निधी वितरीत करण्यास मान्यता
सप्टेंबर २०२५ मध्ये राज्यात विविध जिल्ह्यांत ‘अतिवृष्टी व पूर’ यामुळे शेतीपिकांच्या नुकसानीसाठी शेतकर्यांना मदत देण्याकरिता शासन निर्णयान्वये निक्षित केलेल्या दरानुसार रुपये तीन हजार दोनशे अठ्ठावन कोटी छपन लक्ष सतेचाळीस हजार रूपयांचा निधी वितरीत करण्यास शासनाने मंजूरी दिली आहे. हा निधी पोर्टलव्दारे (Portal) लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बैंक खात्यात निधी वितरीत करण्यात यावा.सर्व लाभार्थ्यांची माहिती विहित नमुन्यात काळजीपूर्वक तयार करुन संबंधित अधिकार्यांनी ती संगणकीय प्रणालीवर भरुन मान्यतेबाबत नियमानुसार कार्यवाही करावी. तथापि, चालू हंगामामध्ये यापूर्वी सर्व विभागांना शेतीपिकांच्या नुकसानीकरिता वितरीत करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमध्ये या प्रस्तांवातर्गत मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश नाही. एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे विहित दराने मदत देण्यात येत असल्याची खात्री करावी.कोणत्याही लाभार्थ्यांना मदत देतांना ब्दिरुक्ती होणार नाही याची तहसिल व जिल्हाधिकारी कार्यालयाने कटाक्षाने काळजी घ्यावी.