पवन जगडमवार
नांदेड (Nanded):- सध्या विवाह सोहळे धुमधडाक्यात सुरू आहेत. ज्यांना सरकारी नोकरी आहे. अशा मुलांना मोठी मागणी वाढली आहे. नोकरीवाल्या मुलांचे विवाह होत आहेत. परंतू उच्चशिक्षिण घेवून बेरोजगार असलेल्या मुलांनी तीशी ओलांडली तरी विवाहासाठी मुलगी मिळत नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. प्रत्येक मुलीला नोकरीवालाच नवरा हवा आहे, ही अट तरूणांसाठी डोके दुखी ठरत आहे. मुलींच्या अपेक्षा वाढल्याने विवाहइच्छुक सुशिक्षित बेरोजगार युवकांनवर मात्र अविवाहित राहण्याची वेळ आली आहे.
एकेकाळी घरात मुलगी जन्मली की, तिच्या कुटूंबाला तिच्या विवाहाची चिंता लागायची, मुलांला मोठ्या प्रमाणात हुंडा (dowry) द्यावा लागत असल्याने मुलगी जन्माला नकोशी वाटायची. त्यामुळे जो मुलगा मिळेल त्या मुलांसोबत विवाह लावून दिले जायचे, एखादा चांगला मुलगा असला काम – धंदा, शेती करणारा थोडेफार शेती असलीतरी त्यांचे ते काम करून उदरनिर्वाह करतील, या अपेक्षेने थोडाफार हुंडा देवून मोठ्या आनंदाने वधु कुटूंबियाकडून विवाह जुळवून दिले जायचे, त्यामुळे बेरोजागार युवकांना काही वर्षाखाली विवाहासाठी मुली मिळायाच्या पण आता परिस्थिती बदलेली आहे.बेरोजगार मुलांसोबत कोणी मुली विवाह करायला तयार नाहीत.
आजच्या धकाधकीच्या काळात मुलीचं भविष्य (future) उज्वल व्हावं ही प्रत्येक मुलीच्या आई-वडीलांची अपेक्षा असते. त्यानुसार तिच्यासाठी वरमुलगा शोधताना मुलगा चांगला असावा ही अपेक्षा करणे चुकीचे नाही. पण मुलाची निवड करतांना समाजातील लोकांचा प्राध्यान्यक्रम चुकीचा झाला आहे. कोणत्याही मुलाची निवड करण्यासाठी फक्त मुलाला सरकारी नोकरी आहे की, नाही पाहणे यासोबतचं तो कसा आहे. याकडे फारसे लक्ष दिले जात नाही. मग लग्नानंतर मुलींना याचे वाईट परीणाम सहन करावे लागतात. मुलगा कमावणारा असला पहिजे यात काही चुकीचं – नाही. पण सगळ्यात आधी पैसा न बघता तो मुलगा कसा आहे.
त्याचे वागणे, बोलणे, सामाजात वावरतांना इतरांशी त्याचा व्यवहार, मुलीला समजून घेणार की, नाही या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करणे तितकेच महत्वाचे आहे.पण याकडे कोणीही लक्ष देत नसल्यामुळे दिवसेंदिवस घटस्फोट (Divorce) होण्याच्या प्रमाणात बरीच वाढ झाली आहे. समाजामध्ये निर्माण झालेले हे भयाण सत्य समाजाला नुकसान देऊनचं जातात. त्यामूळे कुठलाही निर्णय घेतांना सगळ्या गोष्टींचा सारासार विवेकबुध्दीने विचार केला तर आपल्या मुलाचं असो की मुलीच भविष्य बर्बाद होण्यापासून वाचू शकते, असे सुजाण नागरीकांचे मत आहे. सद्यास्थितीत बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड वाढले असल्याने मुलींनीही अवास्तव अपेक्षा ठेऊ नयेत, अशीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
बेरोजगारीला सरकारच जबाबदार; युवकांतून ओरड
दहा-दहा वर्षापासून स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असतांना सरकार मात्र हजार-दोन हजार जागेसाठी नोकर भरती काढून त्यासाठी एक हजार रुपये परीक्षा शुल्क आकारुन बेरोजगार युवकांची लुट करीत आहे. लाखो तरुण बेरोजगार (unemployed) असतांना सरकार मात्र रोजगार देण्यास अपयशी ठरले आहे. नोकरी मिळत नसल्यामुळे तरूण अगोदरच परेशान आहेत. त्यातच विवाहाचे (married) वय वाढत आहे. पण युवकांना नोकरी नसल्यामुळे, तो बेरोजगार असल्यामुळे कोणी मुलगी ही द्यायला तयार नाही. वाढत्या बेरोजगारीला सरकारच जबाबदार असल्याची ओरड युवकांतून सुरु आहे. सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि वाढती बेरोजगारी थांबवावी अशी मागणी होत आहे.