हिंगोली (Hingoli) :- जलेश्वर तलावाच्या सुशोभिकरणाचे काम सुरू असून शनिवारी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी भेट देऊन कामाची पाहणी केली. यावेळी त्यांच्या सोबत आ. तान्हाजीराव मुटकुळे यांचीही उपस्थिती होती. हिंगोली शहरातील पुरातनकालिन जलेश्वर तलावाच्या सुशोभिकरणाचे काम विधानसभा (Assembly) निवडणुकी पूर्वी सुरू झाले आहे. यामध्ये तलावातील गाळ जेसीबीव्दारे (JCB) उपसुन टिप्पर व ट्रॅक्टरमधून वाहुन नेण्यात आला आहे.
तलावाच्या चारही बाजूने संरक्षण भिंत उभारणीचे काम देखील करण्यात आले
यासोबतच तलावाच्या चारही बाजूने संरक्षण भिंत उभारणीचे काम देखील करण्यात आले आहे. तसेच तलावाच्या चोही बाजूने नविन सिमेंट रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हे सुध्दा प्रगतीपथावर आहे. जलेश्वर तलावाच्या सौंदर्यीकरण निमित्ताने अनेक कामे केली जात आहेत. पावसाळ्यापूर्वी तलावाचे काम पूर्ण करण्याच्या अनुषंगाने आ. तान्हाजी मुटकुळे हे वेळोवेळी भेटी देऊन आढावा घेत असतात. २६ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी जलेश्वर तलावाच्या कामाची पाहणी करून समाधान व्यक्त केले. यावेळी त्यांच्यासोबत मुख्याधिकारी अरविंद मुंढे, नगर अभियंता प्रतिक नाईक, स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर, कैलास काबरा, शाम खंडेलवाल, गोल्डी सोनी, कैलास शहाने, आशिष जयस्वाल, अॅड. अमोल जाधव, रजनिश पुरोहीत आदींची उपस्थिती होती. यावेळी वास्तूविशारद सुनिल चौधरी, कंत्राटदार मनिष कयाल यांच्याकडून कामाचा आढावा देखील घेण्यात आला. जून महिन्यामध्ये पावसाळा प्रारंभ होतो. त्यापूर्वी जलेश्वर तलावाच्या विकासाची कामे पुर्ण करण्याकरीता जिल्हाधिकारी गुप्ता यांनी कंत्राटदाराला (Contractor) सूचना दिल्या. सदरील कामे तात्काळ मार्गी लावण्याचे देखील सांगितले.
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी जलेश्वर तलावाच्या कामाची पाहणी करून समाधान व्यक्त केले. तसेच तलाव सभोवतालचे उर्वरित अतिक्रमण धारकाकडील कागदपत्राची पडताळणी करून अतिक्रमणाबाबत योग्य तीे कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच आगामी पावसाळ्यापुर्वी जलेश्वर तलाव विकसित करणे अंतर्गत कामे पुर्ण करण्याच्या दृष्टीकोणातून कामाची गति ठेवावी अशा सूचना दिल्या.