कोरची-मसेली मार्गावरील खड्डे बुजवले
कोरची (Korachi Andolan) : कोरची तालुक्यातील कोरची ते मसेली या राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था आणि खड्ड्यांच्या प्रश्नावर डॉ. शिलू चिमूरकर यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रशासनाला दिलेल्या इशाऱ्यामुळे, स्थानिक प्रशासनाने तातडीने कारवाई केली आहे. बुधवारी डॉ. चिमूरकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देत 24 तासांच्या आत रस्त्यांची दुरुस्ती आणि खड्डे बुजवण्याची मागणी केली होती. याच निवेदनात त्यांनी रस्त्यांवरील दुरवस्थेचे गंभीर परिणाम आणि संभाव्य अपघातांच्या धोकेबद्दल प्रशासनाचे लक्ष वेधले होते.
डॉ. चिमूरकर यांनी रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती न झाल्यास चक्काजाम आंदोलनाचा (Korachi Andolan) इशारा दिला होता. हा इशारा लक्षात घेऊन प्रशासनाने रातोरात कारवाई करत रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम पूर्ण केले. प्रशासनाच्या या त्वरित कारवाईमुळे रस्त्यावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून, वाहतुकीसाठीही अडथळा कमी झाला आहे.
नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद
प्रशासनाच्या या तात्काळ आणि सकारात्मक कारवाईचे स्थानिक नागरिकांनी स्वागत केले आहे. अनेक नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया देताना प्रशासनाने भविष्यातही असेच तत्परतेने काम करावे, अशी मागणी केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत वैष्णवी आकरे वडसा, गिताबाई नाकाडे विसोरा, देवका शेंडे विसोरा, राशन दुकान जिल्हाध्यक्ष लिलाधर भर्रे कुरूड, युवा नेते पींकु बावणे, आसाराम बाळबुद्धे, देवाभाऊ शहारे कोरेगाव, बागेश्वर आळे, कृष्णा उईके, सदाशिव चिंचेकर, गोपाल शेंदरे, नंदलाल गोंडाणे, मोतीराम कांबळे, महादेव कुमरे बोळदा, सर्वेश्वर मेश्राम ईत्यादी कांग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
डॉ. चिमूरकर यांचा निर्धार कायम
प्रशासनाच्या त्वरित कारवाईबद्दल समाधान व्यक्त करताना, डॉ. शिलू चिमूरकर यांनी सांगितले की, “आम्हाला आनंद आहे की प्रशासनाने आमच्या मागण्या मान्य करून रस्त्यांची दुरुस्ती केली. मात्र, भविष्यातही जनतेच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या सुविधांसाठी आम्ही सदैव लढत राहू. (Korachi Andolan) आवश्यक असेल तेव्हा अधिक कडक पावले उचलण्यासही आम्ही तयार आहोत.”
जनतेची मागणी आणि प्रशासनाची जबाबदारी
प्रशासनाच्या या कारवाईमुळे आणि काँग्रेस पक्षाच्या आंदोलनाच्या (Korachi Andolan) धसक्यामुळे कोरचीतील नागरिकांना एका महत्वपूर्ण समस्येपासून दिलासा मिळाला आहे. परंतु, यापुढेही रस्त्यांच्या देखभालीसाठी प्रशासनाला जागरूक राहण्याची आणि जनतेच्या समस्यांवर तत्काळ उपाययोजना करण्याची गरज आहे, असे स्थानिकांकडून आवाहन केले जात आहे.