नाफेडच्या सोयाबीन खरेदीला उरले केवळ सहा दिवस…
अकोला (Akola) : केंद्र सरकारच्या (Central Govt) आधारभूत किमतीमध्ये पण महासंघाकडून (Federation) केल्या जात असलेल्या सोयाबीन खरेदीची मुदत 12 जानेवारीला संपणार आहे. खरेदीसाठी पण तसेच शेतकऱ्यांकडे केवळ सहा दिवस उरले असून, नोंदणी केलेले 18 हजारांवर असलेले शेतकरी अद्यापही रांगेत आहेत. दीड महिन्यापासून नोंदणी केलेल्या जिल्ह्यातील 28 हजार 550 शेतकऱ्यांपैकी आतापर्यंत 10 हजार 94 शेतकऱ्यांचेच (Farmers) सोयाबीन खरेदी होऊ शकले. त्यातच पुरेसा बारदाना उपलब्ध होत नसल्याने सहा दिवसात उर्वरित शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी होऊ शकेल का? असा प्रश्न उपस्थित होत असून, नाफेडची (Nafed) सोयाबीन खरेदी केवळ नावालाच असल्याचे आरोपही होत आहे.
शेतकऱ्यांच्या रेट्यामुळे यंदा नाफेडने सोयाबीन खरेदी वेळेल सुरु केली. सुमारे 20 नोव्हेंबरपासून जिल्ह्यात एकूण 14 खरेदी केंद्रावर खरेदी होत आहे. सोयाबीन खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी (Online registration) करण्याची आज सोमवार, 6 जानेवारी रोजी मुदत संपुष्टात आली असून, 12 जानेवारीपर्यंत खरेदीचा कालावधी आहे. दरम्यान, जिल्ह्यातील विविध 14 केंद्रांवर 28 हजार 550 शेतकऱ्यांनी नोंदणी केल्याची नोंद असून, आतापर्यंत केवळ 10 हजार 94 शेतकऱ्यांचेच सोयाबीन खरेदी होऊ शकले. उर्वरित 18 हजार 456 शेतकरी सोयाबीन खरेदीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे या कालावधीत नोंदणीकृत शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी होईल का? हा कळीचा मुद्दा शेतकरी उपस्थित करीत आहेत.
बारदाना तुटवडा कायमच शेतकऱ्यांचा जीव टांगणीला…
आर्द्रतेची अटही कायम विधानसभा निवडणुकीदरम्यान शासनाने (Government) सोयाबीनमधील आर्द्रता 12 टक्क्यावरून 15 टक्क्यांपर्यंत वाढविण्यात येईल, असे आश्वासित केले होते. त्यामुळे शेतकऱ्यांत उत्साहाचे वातावरण पसरले परंतु, ही अट कायम असून, त्यातच बारदाना (Bardana) तुटवडाही आहे. त्यामुळे सोयाबीन खरेदीत तौडाला पाने पुसली जात असल्याचे शेतकरी आरोप करीत आहेत. शेड्यूलही कागदावरच सोयाबीन खरेदीसाठी जिल्हा पणन कार्यालयाने नोंदणीकृत 14 हजार 194 शेतकऱ्यांचे शेड्यूल तयार केले. परंतु, या शेड्यूलनुसार खरेदी होऊ शकली नाही. बारदाना तुटवडा मोठा फॅक्टर असल्याचे सांगितले जात आहे. आतापर्यंत 10 हजार 94 शेतकऱ्यांकडील 2 लाख 26 हजार 631 क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आले. मुदतवाढ मिळेल? नोंदणीकृत शेतकऱ्यांची संख्या बघता तसेच खरेदीच्या सुरुवातीपासूनच बारदान्याची चणचण बघता सोयाबीन खरेदीला मुदतवाढ मिळण्याची शेतकऱ्यांना आशा आहे. प्रत्येक हमीभावातील शेतमाल खरेदीतसेच ऑनलाइन नोंदणीला मुदतवाढ मिळत आली. त्यामुळे यंदाही सोयाबीन खरेदीला मुदतवाढ मिळण्याचे मानले जात आहे. तर ही खरेदी मुदतीनंतर गुंडाळली जाईल, असेही अनेक शेतकरी बोलत आहेत.
शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी होऊ शकेल का?
पुरेसा बारदाना उपलब्ध होत नसल्याने सहा दिवसात उर्वरित शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी होऊ शकेल का? असा प्रश्न उपस्थित होत असून, नाफेडची सोयाबीन (Soybeans) खरेदी केवळ नावालाच असल्याचे आरोपही होत आहे. 7 लाखांपैकी 3 लाखच नग बारदाना उपलब्ध सोयाबीन खरेदीसाठी जिल्ह्यातून 7 लाख बारदानाची मागणी करण्यात आली असून, सध्या 3 लाख नगच प्राप्त झाले आहेत. पुरेसा होते. बारदाना (Bardana) उपलब्धतेसाठी पणन कार्यालयाकडून सातत्याने पाठपुरावा सुरु असून, दोन दिवसात 1 गाडी बारदाना येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तथापि, प्रत्यक्षात बारदाना उपलब्धतेनंतरच दिलासा मिळेल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.