अमरावती(Amravati) :- पश्चिम विदर्भात वर्षभरात १ हजार १५१ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या असताना या प्रश्नावर सरकारची संवेदनशीलता दिसत नाही. आत्महत्या(suicide) करणाऱ्या शेतक-यांमध्ये हिंदू शेतकऱ्यांची संख्याच जास्त आहे. राज्यात आणि केंद्रात हिंदुत्ववादी सरकार आहे, मग तरीही हिंदू (hindus)शेतकऱ्यांवर स्वतःला संपवण्याची वेळ का येते? असा संतप्त सवाल बच्चू कडूंनी सरकारला विचारला आहे.
‘वाडा’ आंदोलनाने दणाणले विभागीय आयुक्त कार्यालय
प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांच्या नेतृत्वात येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर शेतकरी आणि मेंढपाळांच्या विविध मागण्यांसाठी वाडा आंदोलन सुरू करण्यात आले आहे. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना बच्चू कडू यांनी सरकारवर जोरदार टीका केली. बच्चू कडू म्हणाले, सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागत आहे. आत्महत्या करणाऱ्या शेतकयांमध्ये हिंदूंचीच संख्या जास्त आहे. तरीही केंद्रातील आणि राज्यातील हिंदूत्ववादी सरकारला शेतकऱ्यांचा कळवळा का नाही, हा प्रश्न आहे. आम्ही शेतकरी, शेतमजूर, मेंढपाळांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरलो आहोत. आंदोलनाची ही आमची पहिलीच वेळ नाही. आमचा जन्मच आंदोलनासाठी झाला आहे. पदावर असो किंवा नसो, आम्ही आमची सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्षाची भूमिका सोडणार नाही.
बच्चू कडू व महादेव जानकर आक्रमक
सरकारने आमच्या कापसाचे भाव कोसळले आहेत. नागण्यांची दखल घ्यावी, पोलिसांनी आंदोलकांची अडवणूक करू नये, अशी आमची अपेक्षा असल्याचे बच्चू कडू म्हणाले, राज्यातील मेंढपाळ आपल्या न्याय्य मागणीकरिता सरकारचे उंबरठे झिजवित असताना त्यांच्या मागण्यांच्या संबंधात मुख्यमंत्री कुठलेही ठोस पाऊल उचलत नाहीत. शेतकरी व मेंढपाळांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे सोयाबीन, तूर, 4 of 4 मोर्चादरम्यान कडक पोलिस बंदोबस्त दुसरीकडे बियाणे, रासायनिक खते, ठेवण्यात आला होता. मोर्चात शेळ्या, मॅड्धा आणि घोड्धांसह शेकडो आंदोलक सहभागी झाले होते. राज्य सरकारने विधानसभा शेणखताचे भाव वाढत जात आहे. अशी परिस्थिती असताना शेतकयांनी आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा? असा सवालही कडूयांनी यावेळी सरकारला विचारला आहे. संत गाडगेबाबा मैदानावरून मोर्चाला सुरुवात झाली.
मेंढपाळाच्या वेशात घोडघांवर स्वार होऊन बच्चू कडू(Bacchu Kadu) आणि महादेव जानकर हे विभागीय आयुक्त कार्यालयावर पोहचले निवडणुकीच्या काळात घोषित केलेली सरसकट कर्जमाफी शेतकऱ्यांना तातडीने मिळावी, चराईकरिता परराज्यातून येणाऱ्या मेंढपाळांवर बंदी घालण्यात यावी, अशा अनेक मानण्या यावेळी वाहा आंदोलना तून करण्यात आल्या आहेत.