आरोपी अजूनही फरार, चौथ्या संशयितास अटक
परभणी/पाथरी (Parbhani murder case) : शहरातील सुलभ स्वच्छता गृहात १५ एप्रिल रोजी गंभीर स्वरुपाची मारहाण झालेला अनंता टोम्पे (वय ३५) या तरुणाचा मृतदेह आढळून आल्याची घटना घडली होती. याप्रकरणी (Parbhani murder case) मृतकाच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून पाथरी पोलिसांनी तीन आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला असुन आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी बुधवारी सकाळी मृतदेह पाथरी ठाण्यासमोर ठेवल्यानंतर परिस्थिती तणावपूर्ण झाली होती . पोलिसांनी आरोपींना २४ तासात अटक करू, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी नातेवाईकांनी मृतदेह ठेवला ठाण्यासमोर
मंगळवारी दुपारी शहरातील न .पा .च्या सुलभ शौचालयात ३५ वर्षीय युवकाचा संशयस्पद अवस्थेत (Parbhani murder case) मृतदेह आढळल्यानंतर खळबळ उडाली होती . याप्रकरणी मृत तरुणांची पत्नी रूपाली टोम्पे यांनी मंगळवार १५ एप्रिल रोजी सायंकाळी उशिरा दिलेल्या तक्रारीनुसार, अनंता टोम्पे यांच्याकडील पैसे परत न दिल्याच्या कारणावरून आरोपी भारत वाव्हळे, राहुल शिंदे, व अशोक खंडागळे (सर्व रा. पाथरी) यांनी संगनमत करून त्यांना घरातून बोलावून नेले व गंभीर मारहाण करून ठार मारले.
पोलीसांच्या लेखी आश्वासनानंतर अंत्यसंस्कार
तपासादरम्यान या (Parbhani murder case) प्रकरणात पोलिसांनी चौथ्या एका संशयितास अटक केली असून, याच आरोपीने मृतदेह शौचालयात असल्याची माहिती पोलिसांना दिली. मात्र, मुख्य तीन आरोपी अद्याप फरार आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी तीन पथके तयार केली असून तपास सपोनि स्वामी यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. घटनास्थळी प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी समाधान पाटील, पोनि महेश लांडगे, सपोनि घायवट आणि स्वामी यांनी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला आहे. पोलिसांच्या तपासावर आता सर्वांचे लक्ष लागले असुन मृतकाच्या कुटुंबीयांनी न्याय मिळावा, अशी मागणी जोर धरत आहे.
दरम्यान, १६ एप्रिल रोजी सकाळी परभणी येथे शवविच्छेदन केल्या नंतर मृतदेह पाथरी येथे आणण्यात आला. सकाळी पावणेबाराच्या सुमारास मृतकाच्या नातेवाईकांनी आरोपींना अटक होईपर्यंत अंत्यसंस्कार न करण्याची भूमिका घेत मृतदेह थेट पाथरी पोलीस ठाण्यासमोर असणाऱ्या महामार्गावर ठेवल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन (Parbhani murder case) पोलीस निरीक्षक महेश लांडगे यांनी नातेवाईकांशी संवाद साधला व २४ तासात आरोपींना अटक केली जाईल, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर दुपारी बारा नंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस ठाण्यासमोर मृतकाच्या कुटुंबातील महिलांचा आणि पाच लहान मुलींचा आक्रोश उपस्थितांना अंत:करण हेलावून टाकणारा होता.