देशभरातील शेतशिवारात बहरणार तिळ शिरपेचात मानाचा तुरा..!
परभणी (Parbhani Forestry) : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या लातूर येथील तेलबिया संशोधन केंद्राने विकसित केलेल्या टीएलटी-१० या उत्कृष्ट तीळ वाणाला केंद्र सरकारकडून क्षेत्रवाढीस देशपातळीवर अधिकृत मान्यता मिळाली आहे. त्यामुळे देशभरातील शेत शिवारात आता (Parbhani Forestry) विद्यापीठाचे तीळ बहरणार आहे. केंद्रीय कृषि व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वाण अधिसूचना व प्रसारण समितीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत बैठकीत टीएलटी – १० तीळ या वाणास मान्यता मिळाली आहे. या यशाद्वारे केंद्राने सातत्याने उत्कृष्ट कार्य करण्याची परंपरा कायम ठेवली आहे.
या (Parbhani Forestry) संशोधनात कुलगुरू डॉ. इंद्र मणि यांचे संशोधकांना मार्गदर्शन मिळाले. संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. हिराकांत काळपांडे, प्रभारी अधिकारी डॉ. मोहन धुप्पे, कनिष्ठ पैदासकार, डॉ. शिवशंकर पोले, तेलबिया संशोधन केंद्रातील वैज्ञानिक व तांत्रिक कर्मचार्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांनी देखील टीमचे अभिनंदन करत या नव्या वाणाचा प्रसार प्रभावीपणे करण्याचा विद्यापीठाचा संकल्प आहे.
या वाणाचे बियाणे लवकरच देशभरात विक्रीसाठी उपलब्ध होणार असल्याचे सांगितले.
या राज्यात होणार लागवड
महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा (झोन-१), तसेच गुजरात, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशातील तेलंगणा भाग या राज्यांतही (झोन-३) खरीप हंगामात लागवडीसाठी मान्यता देण्यात आली आहे. या वाणाला ८ ऑक्टोबर २०२४ रोजी अधिसूचित करण्यात आले होते.
टीएलटी-१० वाणाचे वैशिष्ट्य
टीएलटी-१० वाण ९०-९५ दिवसांत परिपक्व होतो आणि ७ ते ८ क्विंटल प्रति हेक्टर इतके उत्पादन देतो. या (Parbhani Forestry) वाणामध्ये ४५.२ टक्के तेलाचे प्रमाण आहे.मँक्रोफोमीना, मुळ व खोडकूज, फायलोडी यांसारख्या रोगांवर तसेच पाने गुंडाळणारी व बोंड पोखरणारी अळी यांसारख्या कीटकांवरही सहनशीलता आहे.