औसा तालुक्यातील एकंबी तांड्यावरच्या दांपत्याची प्रेमभरी सहजीवन अंत्ययात्रा
औसा (Ausa Symbiosis Funeral) : औसा तालुक्यातील एकंबी तांडा येथील रेवा खेमा जाधव (वय 85 वर्षे) आणि त्यांची धर्म पत्नी धानाबाई रेवा जाधव यांनी आज दि.२३/१/२०२६ रोजी एकापाठोपाठ एक असा दोघांनीही आपला जीवन प्रवास संपविला.
एकंबी तांडा येथील रेवा खेमा जाधव यांचा शुक्रवारी सकाळी 6 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले होते. त्यांच्या पार्थिवावर एकंबी तांडा येथील त्यांच्या शेतामध्ये सकाळी दहा वाजता त्यांच्यावर (Ausa Symbiosis Funeral) अंतिम संस्कार करण्यात आले. मागील दहा वर्षापासून धानाबाई रेवा जाधव या आजारी होत्या त्यांचे आजारपणामध्ये पती सेवा करत होते. मात्र अचानकपणे रेवा खेमा जाधव यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी सायंकाळी सहा वाजता त्यांच्या पत्नी धनाबाई रेवा जाधव यांना सांगण्यात आली.
त्यावेळी धनाबाई जाधव यांनी पतीच्या निधनाची बातमी ऐकताच त्यांचीही प्राणज्योत मालवली असून त्यांच्यावर एकंबी तांडा येथील त्यांच्या शेतामध्ये शनिवारी सकाळी अंतिम संस्कार (Ausa Symbiosis Funeral) करण्यात येणार आहेत. गेल्या 10 वर्षांपासून धानाबाई आजारी होत्या. तेव्हापासून रेवा यांनी धानाबाईंची मनापासून सेवा सुश्रुषा केली आणि पतीधर्म निभावला. तर पतीच्या निधनाचे दुःख सहन न झाल्याने धानाबाईनी आपले प्राण सोडले. साता जन्माची साथ निभावून दोघांनी या जगाचा निरोप घेतला हे ऐकून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात चार मुले, एक मुलगी, सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. माजी मुख्याध्यापक बळीराम जाधव यांचे ते चुलते होते.




