परभणी/पाथरी (Parbhani):- शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पाथरी शहरातील उल्हास नगर, शिवाजी नगर या मध्ये असलेल्या रिकाम्या भूखंडावर अतिक्रमण (Encroachment on plot) झालेल्या जागेची बनावट पिटीआर रद्द कराव्यात अशी मागणी आ.बाबाजानी दुर्राणी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
राजकीय पाठबळावर झालेले अतिक्रमण
शहरातील उल्हास नगर व शिवाजी नगरच्या मधोमध असलेल्या रिकाम्या भूखंडावर शिवसेनेचे (Shivsena) पदाधिकारी व माजी नगरसेवक हसीब खान यांनी टिनशेड मारल्यानंतर या जागेची बनावट पिटीआर रद्द करण्याची मागणी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी १४ मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. दिलेल्या निवेदनात त्यांनी अतिक्रमण (Encroachment) झाल्यानंतर उल्हास नगर शिवाजी नगर भागातील नागरिकांनी शासन दरबारी धाव घेतली होती. परंतु राजकीय पाठबळावर झालेले अतिक्रमण काढून टाकण्यासाठी प्रशासनाने आर्थिक व्यवहार (Financial transactions) करत प्रकरणात कोणतीही कारवाई केली नाही. यापूर्वी दोन निवेदने देण्यात आली होती परंतु त्याचा उपयोग झाला नाही.
पी.टी.आर रद्द करून योग्य ती कारवाई
महाराष्ट्र प्रोदशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ च्या कलम ५१ अन्वये सदरील जागेची पी.टी.आर रद्द करण्याचे अधिकार नियोजन प्राधिकृत अधिकारी तथा मुख्याधिकारी नगरपरिषद यांना असल्याने त्याचा वापर करून सदरील पी.टी.आर रद्द करावी . तसेच महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम ९२ अन्वये या अधिनियमाचा वापर करून पाथरी येथील शिक्षक कॉलनी शिवाजीनगर येथील दोन रस्त्याच्या मधील मोकळ्या जागेतील मालमत्ता क्रं . ०५/६६५ व ०६/ ६६६ मधील बोगस तयार करण्यात आलेल्या पी.टी.आर रद्द करून संबंधिता विरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात यावी. अशी मागणी आमदार दुराणी यांनी केली आहे.