हिंगोली (Child marriage) : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर होणारे बालविवाह रोखण्याकरीता जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यापूर्वीच आदेश दिले होते. त्यानुसार ग्राम बाल संरक्षण समिती सतर्क झाली असताना एक बालविवाह व एक साक्षगंधाचा कार्यक्रम उघडकीस आल्याने तो थांबवून वधू वरांच्या कुटूंबाचे समुपदेशन केले.
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर अनेक ठिकाणी विवाह लावल्या जातात. ज्यामध्ये काही ठिकाणी बालविवाह ही लावले जातात. औंढा नागनाथ तालुक्यातील एका गावात (Child marriage) बालविवाह होत असल्याची माहिती मिळाल्याने समितीचे अध्यक्ष तथा ग्रामसेवक गजानन डुकरे, अंगणवाडी सेविका धबडगे, जी. के. ढोबळे, सचिन भोसले यांच्या पथकाने बुधवारी सकाळीच जाऊन सदर बालविवाह थांबविला.
तसेच वसमत तालुक्यातील एका गावात बालविवाह होणार असल्याच्या माहितीमुळे ग्रामसेवक शिवाजी सवंडकर, समितीचे सदस्य मुंजाजी लोहट, माया कवटेकर, अरूणा देशमुख, शोभा खिल्लारे, मंगल खिल्लारे यांनी (Child marriage) विवाहस्थळी जाऊन पाहणी केली असता वधूच्या कुटूंबीयांनी साक्षिगंधाचा कार्यक्रम असल्याचे सांगुन पत्रिकाही दाखविली. परंतु साक्षगंधाचाही कार्यक्रम त्यांना करता ेयेणार नसल्याचे पथकाने सांगितल्याने कार्यक्रम थांबविण्यात आला. यावेळी दोन्हीकडील व्यक्तींचे समुपदेशन करण्यात आले.