मोठे अधिकारी असल्याचा बडेजाव न करता जिल्हा अधिकारी ग्रामस्थांत मिसळले..
आखाडा बाळापूर (Collector Rahul Gupta) :आज शुक्रवारी जिल्हाधिकारी हिंगोली राहुल गुप्ता यांनी कळमनुरी तालुक्यातील नांदेड हिंगोली जिल्हा सिमेवरील वरूड या गावी भेट देऊन गावकऱ्याशी संवाद साधला, गावकरी यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.
जिल्हा अधिकारी राहुल गुप्ता यांनी ग्रामस्थांशी शेतकऱ्याच्या शेतरस्ते पांदन रस्ते, शिव रस्ते या बाबत समस्या जाणून घेतली, तसेच गावात पाणी टंचाई बाबत माहिती घेतली, जिल्हाधिकारी यांनी आपला वेळ देऊन गावकऱ्यांशी त्याच्या समस्या जाणून घेतल्या, तसेच AGRISTACK शेतकरी ओळखपत्र कामाबाबत जाणून घेतली. यावेळी उपविभागीय अधिकारी कळमनुरी प्रतीक्षा भुते, तहसीलदार कळमनुरी जिवककुमार कांबळे, मंडळ अधिकारी प्रेमकुमार चव्हाण व आनंद काकडे, ग्राम महसूल अधिकारी ध्न्यानेश्वर कदम, गणेश माखणे व गावकरी उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी ओळखपत्र काढून घ्यावे..।
यावेळी जिल्हाअधिकारी राहूल गुप्ता यांनी शेतकऱ्यांनी शेतकरी ओळखपत्र काढून घेण्याच आवाहन केले. शेतकरी ओळखपत्राशिवाय शासनाच्या कोणत्याही योजना लाभ घेता येणार नाही यामुळे सगळ्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ओळखपत्र काढून घेण्याच आवाहन त्यांनी यावेळी केले.




