नागपूर(Nagpur):- हिवाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस भाजपच्या सर्व आमदार कडून आज विधानसभा पायऱ्या वर आंदोलन करण्यात आले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या संविधानामध्ये मूळ घटना दुरुस्तीचे 85 वेळा काम कोणी केलं असेल तर या पापी काँग्रेसने. दोन वेळा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पराभव करण्याचं काम कोणी केलं असेल तर काँग्रेसने केलं आहे. या देशाच्या इतिहासामध्ये हे पाप काँग्रेसनेच केलं.
काँग्रेसने दोन वेळा डॉ.बाबासाहेबांचा पराभव करून देशाच्या अपमान केला
भारतरत्न पुरस्कार देण्याची जेव्हा वेळ आली होती तेव्हा काँग्रेसचे सरकार होतं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना न देता पहिले राजीव गांधी यांना देण्याचं काम काँग्रेस ने केलं. राजीव गांधी(Rajiv Gandhi) मोठे होते की भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मोठे होते..? स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण करायचं आणि फुले, शाहू, आंबेडकरांचे, नाव घ्यायचं आणि मतं घ्यायची कधी कधी भेदभाव करून अपमान करायचं काम काँग्रेसने केला आहे. काँग्रेसच खरं काय खोटं काय हे जनतेसमोर आलं पाहिजे म्हणून काँग्रेस किती ढोंगी आहे, यासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन केले आहे. आंदोलन करतांना भाजपचे चंद्रकांत पाटील, आमदार रणधीर सावरकर, आमदार चरण ठाकूर, इत्यादी सर्व आमदार आंदोलन स्थळी उपस्थित होते.