परभणी/ जिंतूर (Parbhani):- शहरातील साठे नगर भागातील नॅशनल उर्दू स्कुल परिसरात तीन तरुणांमध्ये पैसे देण्याघेण्याच्या कारणावरून उद्भवलेल्या फ्रिस्टाईल हाणामारीत एका ३६ वर्षीय तरुणाच्या पाठीवर चाकू भोसकून खून (Murder by stabbing) केल्याची धक्कादायक घटना मंगळवार १४ मे रोजी सायंकाळी ०७:३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी मृतकाचे वडील तय्यब कुरेशी यांच्या फिर्यादीवरून दोन आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल (Filed a case) करण्यात आला असून पोलिसांनी रात्री उशिरा दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
घटनेतील दोन आरोपींना पोलीसांनी केली अटक
सदरील घटनेविषयी अधिक वृत्त असे की, शहरातील साठे नगर येथील ३६ वर्षीय सगननुर उर्फ छगन कुरेशी त्याचा ३१ वर्षीय चुलत भाऊ अलीम कुरेशी आणि चुलत भावाचा ३२ वर्षीय मित्र अमजद कुरेशी हे तिघेजण साठे नगर भागातील नॅशनल उर्दू शाळेच्या परिसरात गेले होते. तिघांध्ये पैसे देण्याघेण्याच्या कारणावरून शाब्दिक चकमक झाली. बघता बघता शाब्दिक चकमकीने उग्ररूप धारण केल्याने परिसरात तिघांमध्ये हाणामारी (fight) सुरू झाली. यातील आरोपी अमजद कुरेशी यांनी सगननुर उर्फ छगन कुरेशी याचे हात धरले आणि अलीम कुरेशी याने धारदार चाकूने त्याच्या पाठीवर जोरदार प्रहार केल्याने सगननुर उर्फ छगन कुरेशी गंभीर जखमी होऊन काहीवेळ घटना स्थळावर रक्तबंबाळ अवस्थेत पडून असल्यामुळे त्याचा प्रचंड रक्तस्राव झाला.
शहरात 11 दिवसात दोन खुनाच्या घटनेमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण
यानंतर जखमी तरुणाला शहरातील ग्रामीण रुग्णालयात (Hospital) उपचारार्थ दाखल करण्यात आले. काही क्षणातच रुग्णालय परिसरात मोठा जमाव जमा झाला. परिस्थिती आवाक्या बाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांनी उपविभागातील पोलीस अधिकारी आणि वाढीव पोलीस कुमकला पाचारण करण्यात आले होते. मात्र जखमी युवकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यावर प्राथमिक उपचार करून परभणी हलविण्यात आले. परंतु रस्त्यातच तरुणाने प्राण सोडले. याप्रकरणी मृतकाचे वडील तय्यब कुरेशी यांच्या फिर्यादीवरून दोन आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल (Filed a case) करण्यात आला असून पोलिसांनी रात्री उशिरा दोन्ही आरोपींना अटक केली आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच गोपनीय शाखेचे पोलीस हवालदार जिया खान यांच्या सह अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल ओव्हाळ, स्थागुशा पो नि अशोक घोरबांड, पोनि बुद्धिराज सुकाळे आदींनी भेट दिली. परंतु मागील अकरा दिवसात शहरात सार्वजनिक ठिकाणी खुनाच्या दोन घटना आणि दोन गटात झालेल्या सशस्त्र हाणामारीच्या (armed conflict) घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.