रिसोड तालुका पत्रकार संघाची पालकमंत्र्यांकडे मागणी
रिसोड (Risod Tehsil) : मागील अनेकदा रिसोड तालुक्यात नैसर्गिक आपत्ती ओढवल्याचे अनेक उदाहरणे आहेत. रिसोड शहरासह संपूर्ण तालुका अनेक नदी-नाल्यांनी वेढलेला आहे.त्यामुळे नागरिक व शेतकऱ्यांना आपल्या दैनंदिन कामांसाठी नदी-नाल्यातुन प्रवास करावा लागतो.अनेकदा अचानक आलेल्या पुराच्या प्रवाहात शेतामध्ये गेलेले नागरिक अडकुन पडतात.आशा वेळेस आपत्ती व्यवस्थापन समिती तसेच शोध-बचाव पथकाची भुमिका स्थानिक नागरिकांनाच पार पाडावी लागते,आशा प्रसंगासाठी आपत्ती व्यवस्थापनाचे साहीत्त डिपीडीसी मधुन उपलब्ध करून देण्यासाठी रिसोड पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष सतिष मांदळे यांच्या नेतृत्वात पालकमंत्री मा.दतात्रय भरणे यांच्याकडे केली आहे.
अतिवृष्टी मध्ये अनेकदा जीवावर उध्दार होऊन कार्य करावे लागते. या पार्श्वभूमीवर (Risod Tehsil) रिसोड तालुका पत्रकार संघ यांनी जिल्हा नियोजन समितीकडुन तालुकास्तरावर आपत्ती व्यवस्थापन विभागाला आवश्यक यंत्र-साहित्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी कृषीमंत्री तथा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना निवेदनाद्वारे केली.पत्रकार संघाचे म्हणणे आहे की,आवश्यक साधनसामग्री उपलब्ध झाल्यास नैसर्गिक आपत्तीच्या काळात तसेच नदीच्या पात्रात किंवा पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांना वाचवणे सोपे जाईल.सदर निवेदन देताना रिसोड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सतीश मांदळे, गजानन बानोरे,संतोष वाघमारे, शितल धांडे,केशव गरकळ यांच्यासह विविध पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




