जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांची कारवाई
हिंगोली (Hingoli crime) : सराईत गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या टोळी विरूध्द जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी कडक कारवाई केली असून ५ गुन्हेगारांना जिल्ह्यातून (Hingoli crime) हद्दपार करण्यात आले आहे.
बासंबा, नर्सी नामदेव पोलिस ठाणे हद्दितील संतोष शंकरराव जाधव, सुशिल बबन वाकळे, आशितोष निळकंठ ढाले रा. बासंबा दिलीप कठाळू काळे, सुनिल दिलीप काळे, रा नर्सी नामदेव या पाच जणां विरूध्द शरीर व माला विरुध्दचे ५ गुन्हे दाखल असून सतत संगठीत पणे गुन्हे करीत असल्याने त्यांच्या विरूध्द बासंबा ठाण्याचे सपोनि विकास आडे व नर्सी ना ठाण्याचे पोलिस निरीक्षक सानप यांनी कलम ५५ महाराष्ट्र पोलिस कायदा अन्वये हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला होता.
त्याची प्राथमिक चौकशी उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश दळवे, अंबादास भुसारे यांनी करून या (Hingoli crime) आरोपीच्या टोळीस हद्दपारीबाबत पोलिस अधिक्षक हिंगोली यांच्याकडे शिफारस केल्याने पाचही गुन्हेगारांना हद्दपार करण्याचे आदेश पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी काढले आहेत. ही कारवाई पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विकास पाटील, प्रविण क्षिरसागर यांनी केली आहे.