धामणगाव रेल्वे (Dhamangaon Accident) : तालुक्यातील नागपूर औरंगाबाद महामार्गावर ओव्हरटेक करताना (Dhamangaon Accident) मालवाहू टाटा-एस च्या डिझेल टँकरला लागलेल्या जोरदार धडकेत टाटा-एस मधील दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. सदर अपघात मंगळवारला दुपारी दीड वाजताच्या सुमारास झाला.
नागपूर-औरंगाबाद महामार्गावर घडला भीषण अपघात
तनस विक्रीसाठी अंजनगाव बारीला आलेल्या देवळी तालुक्यातील चार जण टाटा-एस ने आपल्या गावाकडे परत जात होते.दि. ११ जून रोजी दुपारी दीड वाजता दरम्यान नागपूर औरंगाबाद महामार्गवर तळेगांव दशासर पासून काही अंतरावर लोया यांच्या शेताजवळ काही कारणांस्तव रस्त्याच्या कडेला एक डिझेल टँकर एम. एच. ३८ डी ९७८६ हा उभा होता. टाटा-एस अप वाहन क्रमांक एम. एच. ३२- ए. जे. ३४७८ मध्ये चालकासह ४ जण होते याच मार्गाने देवगाव कडे जात होते. (Amravati Accident) दरम्यान भरधाव वेगाने टाटा-एस अचानक समोर असलेल्या डिझेल टँकरला येऊन भिडले.
मालवाहू टाटा-एस ची टँकरला धडक
यात पीक अप वाहनातील राहुल रामदास मांढरे (२६),विजय विठ्ठल मांढरे (३२) रा.भोपापुर वाणी ता. देवळी जि. वर्धा दोघांचा (Dhamangaon Accident) घटनास्थळीच मृत्यू झाला.तर दिलीप सोनबाजी न्हाने (३७) रा.भोपापुर वाणी ता. देवळी जि. वर्धा व चालक किशोर रामचंद्र नेहारे (३३) रा लोणी ता. देवळी जि. वर्धा हे दोघे गंभीर जखमी झाले. जखमींना महामार्ग पोलीस पथकाचे सदानंद देशभ्रतार,कुंदन राठोड,तळेगाव दशासर पोलिस ठाण्यातील रमेश दाते,विनोद राठोड,संजय राऊत,विजयसिंग बघेल यांनी स्थानिकांच्या मदतीने धामणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात (Dhamangaon hospital) दाखल करण्यात आले होते.परंतु अधिक उपचारार्थ यवतमाळ येथील (Dhamangaon hospital) रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.तळेगाव दशासर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे.अधिक तपास ठाणेदार रामेश्वर घोंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली (Dhamangaon Police) तळेगाव पोलीस करीत आहे.