प्रशासकीय कामासाठी नायब तहसीलदाराची निवड
बार्शी टाकली (Gram Mandal Sarav) : बार्शीटाकळी तालुक्यातील ग्राम मंडळ सराव चे अध्यक्ष वसंतराव जाधव यांची मुदतवाढ रोखून, प्रशासकीय कामकाजाकरिता नायब तहसीलदारांची निवड केल्याचा आदेश अकोला जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
बार्शीटाकळी तालुक्यातील ग्राम मंडळ सरावचे (Gram Mandal Sarav) अध्यक्ष वसंतराव रायसिंग जाधव यांचा कार्यकाळ 28 डिसेंबर 2025 ला संपला. यानंतर त्यांनी अकोल्याचे जिल्हाधिकारी यांचे कडे प्रशासकीय कर्तव्य पार पाडण्याकरिता महाराष्ट्र ग्रामीण अधिनियम 1964 परिशिष्ट1, प्रकरण 03 कलम 11 (5) नुसार नवीन उत्तराधिकारी येईपर्यंत प्रशासकीय कर्तव्य पार पाडण्याकरिता मुदतवाढ मिळावी. याकरिता अकोल्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडे विनंती अर्ज सादर केला होता.
दुसरे असे की (Gram Mandal Sarav) सराव गावातील सामाजिक कार्यकर्ते रामेश्वर बंडू राठोड व इतर ग्रामस्थांनी दिनांक 30 डिसेंबर 2025 ला ग्रामदान मंडळाचे विनियम करून घेणे बाबत व जोपर्यंत विनियम प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत ग्राम मंडळ अध्यक्ष उपाध्यक्ष यांची निवडणूक घेण्यात येऊ नये तसेच ग्राम दानमंडळ सराव चा कारभार विनियम तयार होईपर्यंत प्रशासकाची नेमणूक करण्याची मागणी केली होती.
महाराष्ट्र ग्रामीण मंडळ बोर्ड मुंबई यांचे दिनांक 4 मे 2023 व दिनांक 20 जानेवारी 2025 च्या पत्रा अन्वये महाराष्ट्र ग्रामीण अधिनियम 1964 च्या कलम 14 (3)नुसार, ग्राम मंडळाचे अध्यक्ष व उपाध्यक्ष ही पदे रिक्त असतील तेव्हा नायब तहसीलदार यापेक्षा खालचा दर्जा नसलेल्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करणे बाबत कळविण्यात आले होते. महाराष्ट्र ग्रामीण अधिनियम 1964 च्या कलम 44 मध्ये ग्राम मंडळास राज्य सरकारच्या पूर्व मंजुरीने सर्वसाधारणपणे या अधिनियमाचे उद्देश पार पाडण्यासाठी या अधिनियमांची व तदन्वये केलेल्या नियमाची सुसंगत असतील असे विनियम करता येतील अशा प्रकारची तरतूद आहे.
ग्राम मंडळ सराव बाबतीत ग्राम मंडळाकडून विनियम करण्याबाबतचा कोणत्याही प्रकारची माहिती राज्य सरकारच्या पूर्व मंजुरीने नियम 44 नुसार कोणतीही विनियम केलेले नाही त्यामुळे ग्राम मंडळ सराव च्या बाबतीत अधिनियमाच्या कलम 11 5 नुसार कारवाई करता येत नसल्याने, अकोल्याचे जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी दिनांक 23 जानेवारीला एका आदेशानुसार महाराष्ट्र ग्रामीण अधिनियम 1966 चे नियम 11 (अ) पोट कलम (2) व नियम 14 (3) नुसार अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष यांची निवडणूक होईपर्यंत, ग्राम मंडळाच्या प्रत्येक मंडळाच्या बैठकीची अध्यक्षता करण्यासाठी तथा प्रशासकीय कामकाज करण्यासाठी बार्शीटाकळी चे नायब तहसीलदार अक्षय नागे यांची निवड केली आहे.
यावेळी ग्रामसेवक (Gram Mandal Sarav) यांनी पदाचा कार्यभार पाहावा. वेळोवेळी होत असलेल्या बैठकाच्या अध्यक्षस्थानी नायब तहसीलदार हे राहतील. अशा प्रकारचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सराव गावामध्ये एकच खळबळ निर्माण झाली आहे.




