मुंबई (Election 2024) : लोकसभा निवडणूक-2024 च्या (LokSabha Election) चौथ्या टप्प्यात आज महाराष्ट्रातील 48 लोकसभा जागांपैकी 11 जागांवर मतदान झाले. आज मतदान सकाळी 7 वाजल्यापासून सुरू झाले असून, ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत पूर्ण आहे. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत महाराष्ट्रात 52.49 टक्के मतदान झाले. (Maharashtra Election) महाराष्ट्रातील नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड या जागांवर मतदान झाले. या जवळपास सर्वच जागांवर भाजप आणि काँग्रेसमध्ये स्पर्धा आहे.
तुमच्या जिल्ह्यात किती मतदान?
अहमदनगर:- 53.27 टक्के
औरंगाबाद:- 54.02 टक्के
जळगाव:- 51.98 टक्के
जालना:- 58.85टक्के
नंदुरबार:- 60.60 टक्के
पुणे:- 44.90 टक्के
बीड:- 58.21 टक्के
मावळ:- 46.03 टक्के
रावेर:- 55.36 टक्के
शिर्डी:- 55.27 टक्के
शिरूर:- 43.89 टक्के