परभणी(Parbhani):- नळाला पाणी आल्याने पाण्याची मोटार चालू करत असताना विजेचा धक्का(Electric shock) लागुन ३८ वर्षीय तरुणाचा मृत्यू (Death) झाला. ही घटना मंगळवार २८ मे रोजी रात्री सव्वा नऊच्या सुमारास परभणी शहरातील खानापूर परिसरात घडली. या प्रकरणी नवा मोंढा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची(sudden death) नोंद करण्यात आली आहे.
परभणी शहरातील खानापूर येथील घटना, अकस्मात मृत्युची नोंद
शिवप्रसाद संजीवराव शिंदे वय ३८ वर्ष रा. खानापूर, असे मयताचे नाव आहे. या बाबत गोपाळ शिंदे यांनी पोलिसात खबर दिली आहे. नळाला पाणी आल्याने शिवप्रसाद हे पाण्याची मोटार चालू करत होते. यावेळी त्यांना विजेचा धक्का लागला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर नवा मोंढा पोलीस ठाण्यातील पोउपनि. हांडे व कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा (Panchanama) केला. प्रकरणाचा तपास पोह. नागरगोजे करत आहेत.