हिंगोली (hingoli):- जिल्हा हिंगोली कळमनुरी तालुक्यातील मौजे पिंपरी बु शेतशिवारात मंगळवारी सायंकाळी वीजपडुन (lightning) शेतकर्याचा मुत्यू (Death) झाला.
अंगावर वीज पडून त्यांचा जागीच मृत्यू
पिंपरी बु. शेतशिवारात शेतकरी गोविंद किशन कदम हे मंगळवारी सायंकाळी जनावरांसाठी चारा घेत असताना अचानक वारे व पाऊस सुरू झाला. यात गोविंद कदम यांच्या अंगावर वीज पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. गोविंद कदम यांच्या पश्चात आई वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी,भाऊ असा मोठा परिवार आहे. आखाडा बाळापूर ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन (Autopsy) करून पिंपरी शिवारात त्यांच्यावर १२ जून बुधवार रोजी अत्यंसंस्कार(Cremation) करण्यात आले.