१११० शेतकरी चुकार्यांच्या प्रतीक्षेत
१० कोटी रुपयांचे चुकारे बाकी
मंगेश डहाके
आंधळगाव/पालडोंगरी (Farmers financial crisis) : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर धानाची लागवड केले जाते. खरीप २०२४ मध्ये आधारभूत धान खरेदी केंद्रावर हमीभाव २ हजार ३०० रुपये क्विंटल असल्याने बर्याच शेतकर्यांनी आपला (Farmers financial crisis) धान आधारभूत धान खरेदी केंद्रांवर विकला आहे. मात्र अजूनही दि.१५ फेब्रुवारी ते ३१ मार्च पर्यंतचे १ हजार ११० शेतकर्यांचे १० कोटी रुपयांचे धान चुकारे अडलेले आहेत. त्यामुळे त्यांनी पैसे कोणाकडे मागावे, हा त्यांच्या पुढे प्रश्न निर्माण झाला आहे.
आधिच धान खरेदी केंद्र सुरू व्हायला उशीर झाला होता. त्यातही ऑनलाईन करण्यासाठी शेतकर्यांना खरेदी केंद्रांवर बराच मन:स्ताप सहन करावा लागला. धानाचे मोजमाप तर झाले पण चुकारे मात्र शेतकर्यांच्या खात्यात अजूनही आलेले नाहीत. (Farmers financial crisis) शासन शेतकर्यांप्रती उदासीन असल्याचे दिसून येते. अवघ्या काही दिवसानंतर शेतीच्या खरीप हंगामाला सुरुवात होणार आहे. त्यासाठी शेतकर्यांना बी-बियाणे, खते, शेतीची मशागत करणे, या सर्व बाबींसाठी पैसा आवश्यक आहे. धान खरेदी केंद्रावर धान दिल्यास पैसे तातडीने खात्यात जमा होतील, या आशेवर शेतकरी होते. परंतू त्यांच्या पदरी निराशाच पडली आहे. शेतकर्यांकडे पैसे नसल्याने कोणाकडे हात पसरायचे, हा प्रश्न त्यांच्या पुढे उभा ठाकलेला आहे.
कृषिप्रधान देशात शेतकरी नागवला जात आहे. (Farmers financial crisis) शेतकर्यांच्या भरवशावर देशाची अर्थव्यवस्था असतांना तोच आर्थिक संकटात जीवन जगत आहे. ऑनलाइनच्या विश्वात आधारभूत धान केंद्रावर शेतकर्यांना बर्याच आटापीटा माराव्या लागतात. धानाचे चुकारे जर तातडीने मिळाले नाही तर आपला उदरनिर्वाह चालवण्यासाठी पुन्हा शेतकर्यांना खाजगी सावकाराच्या दारात उभे राहिल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून लोकप्रतिनिधिंनी सुद्धा तातडीने शासनाकडे पाठपुरावा करावा व अडलेले धानाचे चुकारे शेतकर्यांच्या खात्यावर वळते करावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.