एकुण पिकाच्या क्षेत्रापैकी केवळ ४३.३८ टक्के क्षेत्र ओलीताखाली
गडचिरोली (Farmers Rainwater) : जिल्ह्यात तलाव,बोड्या मोठया प्रमाणात आहेत. मात्र शाश्वत सिंचनाची सुविधा अद्यापही करण्यात आली नसल्याने जिल्हयातील शेतकर्यांना पावसाच्या पाण्यावरच अवलंबून रहावे लागत आहे.जिल्ह्यात अद्यापही एकुण पिकाच्या क्षेत्रापैकी ४३.३८ टक्के क्षेत्र ओलीताखाली आले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
सन २०२३-२४ च्या ऋतु व पिके अहवालानुसार जलसिंचन करणार्या विविध प्रकारच्या साधनांनी भिजविल्या जाणार्या क्षेत्राचा विचार केला असता असे दिसून येते की, या जिल्ह्यामध्ये नैसर्गिक पावसाची उपलब्धता बर्याच प्रमाणात असल्यामुळे (Farmers Rainwater) विहीरीच्या पाण्यावर होणारे ओलीताचे प्रमाण तलाव, कालवे, बोड्या इत्यादी साधनांनी होणार्या ओलीताच्या प्रमाणापेक्षा नेहमी बरेच कमी राहत आले आहे.
२०२३-२४ या वर्षी ओलीताखालील निश्वळ क्षेत्र ७३,७४७.५० हेक्टर असून त्यापैकी ५८.०३०.७५ हेक्टर क्षेत्र पृष्ठभागीय व उर्वरित १५.७१६.७५ हेक्टर क्षेत्र विहिरी पासून ओलीत करण्यांत आलेले आहे. जिल्ह्यात एकूण १४,७३७ सिंचन विहीरी आहेत. या जिल्हयात दोन मोठे प्रकल्प असून त्यापासून सिंचन सुरु असून ओलिताखाली असलेले क्षेत्र १७,६०५.१२ हेक्टर इतके आहे. जिल्ह्यात सन २०२३-२४ मध्ये स्थूल भिजणारे क्षेत्र ८९.१४९.३८ हेक्टर इतके आहे. यापैकी सर्वाधिक ओलीताखालील निव्वळ क्षेत्र चामोर्शी तालुक्यात २५ टक्के असून त्याखालील कुरखेडा, आरमोरी व गडचिरोली तालुक्यात अनुक्रमे १४.९६ टक्के, १३.६० टक्के व १३.१७ टक्के होते. तर भामरागड तालुक्यात अत्यल्प ०.६५ टक्के क्षेत्र निव्वळ ओलीताखालील असल्याचे दिसून येते. २०२३-२४ या वर्षात जिल्ह्यात ओलीताखालील एकूण क्षेत्र हे एकूण पिकाखालील क्षेत्राच्या ३८.४३ टक्के होते.
मोठे-लघु सिंचन प्रकल्प अपुर्णावस्थेत
गडचिरोली जिल्ह्यात १५०० ते १६०० मिलीमिटर एवढा प्रचंड पाऊस पडत असल्यामुळे (Farmers Rainwater) विहीरीद्वारे सिंचन फार कमी आहे. लहान-लहान बांध घालून पावसाचे बाहून जाणारे पाणी तलाव अथवा बोड्या यामध्ये साठवून ठेऊन त्याद्वारे धान शेतीला पाणी देण्याची प्रथा जिल्ह्यात पूर्वापार बालू आहे. जिल्हयात सन २०२३-२४ मध्ये गोंदिया जिल्ह्यातील इटियाडोह प्रकल्पाचे कालव्याद्वारे ६६१०.१२ हेक्टर क्षेत्र भिजविण्यात आले. तर रेगडी येथील दिना या मोठ्या प्रकल्पाद्वारे १०,९९५ हेक्टर क्षेत्रात सिंचन झाले आहे. याशिवाय कारवाफा प्रकल्प, तुलतुली प्रकल्प, डोंगरगांव -ठाणेगांव, चेन्ना, कोटगल उ.सि.यो.. तळोधी-मोकासा, हल्दी-पुरानी उ.सि.यो, रेगुंठा उ.सि.यो. या प्रकल्पांचे काम देखील सुरु करण्यांत आले होते. परंतु प्रशासकिय अडचणीस्तव सदर प्रकल्पांचे काम बंद असून ते काम पूर्ण झाल्यास ५४.७७८ हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
चिचडोह प्रकल्पाची गत दुरून डोंगर साजरे सारखी
कोटयावधी रूपये खर्च करून चामोर्शी तालुक्यात मार्वंâडनजीक वैनगंगा नदीवर चिचडोह बॅरेज निर्माण करण्यात आले. या बॅरेजमध्ये (Farmers Rainwater) पाणीही साठवून ठेवल्या जात आहे. मात्र कालवे तयार करण्यात न आल्याने हे बॅरेज दुरून डोंगर साजरे असे निदर्शनास येत आहे.यामुळे धरण उशाला ,कोरड घशाला अशी चामोर्शी तालुक्यातील शेतकर्यांची गत होत आहे.




