लाखांदूर तालुक्यातील तावशी येथील घटना
तालुक्यातील शेतकऱ्याची तिसरी घटना
बारव्हा (Farmers suicide Case) : सततची नापिकी व बँक, सोसायटी मधून घेतलेल्या कर्जाची परतफेड करणे शक्य होत नसल्याने या मानसिक विवेचनेतून एका सवीस वर्षीय तरुण शेतकऱ्याने घरीच मयालीला गळफास घेवून (Farmers suicide Case) आत्महत्या केल्याची घटना घडली. सदरची घटना लाखांदूर तालुक्यातील तावशी येथे दि. 10 एप्रिल रोजी सायंकाळी 8:30 वाजताच्या दरम्यान घडली.नितीन देवचंद राखडे वय 26 वर्षे रा. तावशी ता. लाखांदूर असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार नितीन हा अल्पभूधारक शेतकरी असून त्याच्याकडे दिड एकर शेती आहे. (Farmers suicide Case) शेतात बोअरविहीरच्या माध्यमातून सिंचन सुविधा असल्याने त्या शेतीत दरवर्षी रब्बी व खरीप असे दोन फसल घेत होता. त्याने मागील दोन वर्षांपूर्वी बँक व सोसायटी कडून कर्ज घेतले होते. खरीप हंगामात दिड एकर शेतात धान पीकाची लागवड केली होती. मात्र त्याहीवेळी शेतीला लावलेले खर्चही निघाले नाही. उलट बँक व सोसायटीचे कर्जात वाढ होवून ते डोक्यावर बसले.पुन्हा उधारउसने करून रब्बी धान पिकाची लागवड केली.
मात्र वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने शेतीला शिंचन करणे शक्य नाही. तर वातावरण बदलाचासुद्धा शेत पिकाला फटका बसल्याने रोगराईने धान पीकसुद्धा फस्त होत आहे. त्यामुळे घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करायची. या आर्थिक व मानसिक विवेचनात असलेल्या नितीनने स्वतःच्या राहत्या घरी स्वयंपाक खोलीमध्ये मयालीला स्वतःच्या दुपट्टाने गळफास घेवून जीवनयात्रा संपविली. वडील स्वयंपाक खोलीत गेले असता त्याला गळफास लागलेल्या अवस्थेत नितीन दिसून आला. या (Farmers suicide Case) घटनेची माहिती दिघोरी /मोठी पोलिसांना देण्यात आली.
माहिती मिळताच दिघोरी/मोठी पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रमोद शिंदे यांनी आपल्या ताफासह (Farmers suicide Case) घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला. फिर्यादी देवचंद राखडे यांच्या तोंडी रिपोर्ट वरून सदरचा मर्ग दाखल करण्यात आला असून ठाणेदार प्रमोद शिंदे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार राजेश शेंडे पुढील तपास करीत आहेत.