देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Farmers: ओलित नाममात्र, तर फळबाग निरंक, राजकीय उदासीनता, सर्व्हबाबत शेतकरी वर्गात संताप!
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भवाशिम

Farmers: ओलित नाममात्र, तर फळबाग निरंक, राजकीय उदासीनता, सर्व्हबाबत शेतकरी वर्गात संताप!

Deshonnati Digital
Last updated: 2025/10/09 at 8:22 PM
By Deshonnati Digital Published October 9, 2025
Farmers

रिसोड तालुक्यातील शेती कोरडवाहु!

रिसोड (Farmers) : अतिवृष्टीचा फटका बसलेल्या बळीराजाला सावरण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने 31 हजार 628 कोटी रुपयांचे विशेष पॅकेज जाहीर केले.आता पर्यंतची सर्वात मोठी आर्थिक मदत,असे शेतकरी मदत पॅकेजचे वर्णन करण्यात आले. हातातोंडाशी आलेले पीक पुरात वाहून गेल्याने राज्याच्या विविध भागांतील शेतकरी अक्षरक्ष: हवालदिल झाले आहे.परंतु रिसोड प्रशासनाच्या (Administration) वेळकाढू धोरणामुळे व सोयीनुसार केलेल्या सर्वेक्षणाने शेकडो शेतक-यांच्या तोंडाला पाने पुसल्याची परीस्थिती निर्माण झाल्याने अनेक शेतकरी शासन देत असलेल्या हक्काच्या मदती पासुन वंचीत राहात आहे.

नुकसानाचे सर्वेक्षण हे दुटप्पी झाल्याचा आरोप!

यंदा पावसाने सर्वत्र हाहाकार केल्याने तालुक्यातील अनेक ठिकाणी अतिवृष्टीसह (Heavy Rain),ढगफुटी सदृश्य पावसाने शेती खरडली,काही ठिकाणी पाळीव प्राणी दगावले,शेती खरडली तर विहीरी गाळल्या परंतु तालुक्यातील महसुल,कृषी,पंचायत विभागाच्या स्वाक्ष-याने झालेले नुकसानाचे सर्वेक्षण हे दुटप्पी झाल्याचा आरोप होत आहे. याकडे गंभीर प्रकाराकडे सर्वच राजकीय पक्षांना दुर्लक्ष केले आहे.

अतिवृष्टीतील सर्वेक्षणावर प्रश्न चिन्ह निर्माण!

रिसोड तालुक्यात शेतीचे क्षेत्र एकुण 74000 हेक्टर शेत जमीन आहे,त्यापैकी शासनाने केलेल्या पंचनामा मध्ये 40747.02 हे.जिरायती , बागायत 424.70 हे आणि फळबाग 0 नमुद करून अ ब क ड अहवाल सादर केला आहे,त्यामुळे अतिवृष्टीतील सर्वेक्षणात फळबाग शुण्य टक्के नुकसान रिसोड तालुक्यात दाखविल्याने या अतिवृष्टीतील सर्वेक्षणावर प्रश्न चिन्ह निर्माण झाल्याची चर्चा आहे.कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यात 4000 हेक्टर पेक्षा जास्त फळबाग लागवडचे क्षेत्रफळ आहे.मग नुकत्याच जाहीर झालेल्या सर्वेक्षणात फळबागाचे नुकसान शुन्य दाखविल्याने या सर्वेक्षणावर प्रशचिन्ह निर्माण झाल्याचे दिसत आहे.महागांव येथिल अनिल मवाळ यांच्या शेतातील 25 जुनच्या अतिवृष्टीत शेती खरडली,रोजगार हमीची विहीर गाळली,स्पींकलर,पाईप,शेतातील माती सह हळद पिक वाहुन गेल्याने त्यांचे अंदाजे सहा लाखा पेक्षा जास्त नुकसान झालेले आसतांनी महसुल, प्रशासनाला मात्र शेतकऱ्याच्या नुकसानाचा विसर पडल्याने नुकत्याच जाहीर झालेल्या मदती मध्ये संबंधित शेतकरी मदती पासुन वंचीत राहत आहे या बाबत रिसोड तहसीलदार यांच्याकडे नुकसानाच्या भरपाई संदर्भात लेखी तक्रार सुद्धा दिली होती. आता पर्यंतची सर्वात मोठी मदत म्हणून महायुती सरकार जाहिरातबाजी केल्याशिवाय राहणार नाही.पण नुसती मदत जाहीर करून आपली जबाबदारी सरकारला ढकलता येणार नाही.अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा होईल,‘पॅकेज’ हा नुसता आकड्यांचा खेळ न ठरता शेतकरी पुन्हा उभा राहील,याचीही खबरदारी शासनातील वरिष्ठांना घ्यावी लागेल. कारण स्थानिक पातळीवरील लालफितीचा मोठा फटका शेतकऱ्यांना नेहमीच खते खरेदी पासुन,कर्ज पुरवठ्यापर्यंत सगळीकडे बसत असतो.यावेळची ही मदत शेतकरी वर्गासाठी सार्थ ठरावी हीच अपेक्षा

[ruby_related total=5 layout=5]

TAGGED: Administration, farmers, heavy rain

वाचण्यासारखी बातमी

Barshitakali Election
विदर्भअकोलाराजकारण

Barshitakali Election: निवडणुकीच्या काळात पक्ष बदलून आलेल्यांना उमेदवारी मिळण्याचे संकेत

November 11, 2025
Risod Municipal Council Election
विदर्भराजकारणवाशिम

Risod Municipal Council Election: रिसोड नगरपरिषद निवडणूकीमध्ये महायुतीत ‘नॉट गुड’, एकला चला ची भूमिका

November 11, 2025
विदर्भअकोलाक्राईम जगत

Woman Murder Case: धामणदरीच्या महिलेचा गळा आवळून खून

November 11, 2025
Hitapadi-Mispiri Road
विदर्भगडचिरोली

Hitapadi-Mispiri Road: कोटरा माहाका, हितापाडी, मिसपीरी मुख्य मार्गावर रहदारी धोकादायक

November 11, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?