अपूर्ण कामावर चर्चा, फिनले मिल, बैतूल, परतवाडा अमरावती महामार्ग, चांदूरबाजार बायपास , पूलांचे नूतनीकरण
परतवाडा (Nitin Gadkari) : आपल्या कार्यकाळात झालेल्या विविध विकासात्मक कामातील रखडलेल्या कामासंदर्भात माजी आमदार बच्चू कडू (Bachu Kadu) यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांची नागपूर येथे भेट घेतली. अचलपूर येथील फिनले मील, परतवाडा अमरावती महामार्ग, पूलांचे नूतनीकरण, बहिरम बैतूल मार्ग व इतरही विकासात्मक बाबीवर चर्चा झाली. तात्काळ कामे केल्या जाणार असल्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.
अचलपूर विधानसभा मतदारसंघात कोट्यवधी रुपयांची विकासकामे माजी आमदार बच्चू कडू (Bachu Kadu) यांच्या कार्यकाळात करण्यात आली. त्याच कामांमध्ये काही कामे अपूर्ण असल्याने त्या संदर्भात माजी आमदार बच्चू कडू यांनी नागपूर येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांची भेट घेऊन संबंधित कामे पूर्ण करण्यासंदर्भात चर्चा वजा विनंती केली. गडकरींनी सुद्धा या संपूर्ण कामांची माहिती घेत लवकरच ती कामे मार्गे लावणार असल्याचे सांगणे अस्वस्थ केले.
परतवाडा अमरावती मार्ग, पूलांचे काम
जिल्ह्यात सर्वाधिक वर्दळीचा परतवाडा ते अमरावती मार्ग आहे दिवसभर शेकडो वाहने धावतात परंतु विविध अडथळ्यांनी तो आतापर्यंत रखडला त्यासाठी सतत आपलं कार्यकाळात बच्चू कडू (Bachu Kadu) यांनी प्रयत्न केले राहिलेला हा प्रकल्प पूर्ण करण्याची विनंती त्यांनी नितीन गडकरी यांना केली. त्यासोबतच परतवाडा ते चांदूरबाजार मार्गावरील कुरळ पूर्ण व तळेगाव मोहना येथील पुलाचे काम राहिले असून उर्वरित रस्त्याचे चौपदरीकरण झाले दोन्ही पुलाची काम प्राधान्याने करण्यात यावी. बळीराम बैतूल मार्गावरील अर्धवट राहिलेला मार्ग पूर्ण करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
फीनले मील,चांदूरबाजार बायपास
अचलपूर येथील फीनले मिल गेल्या काही वर्षापासून बंद पडून आहे शेकडो कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. अनेकदा यासंदर्भात निवेदने चर्चा आंदोलन बैठका सुद्धा झाल्या. परंतु तोडगा निघत नाही त्या संदर्भात नफ्यात असलेले या मिलला पुनर्जीवन देण्या सोबत रोजगाराचा रखडलेला मार्ग सुरू करण्याची मागणी करण्यात आली. त्याचप्रमाणे चांदूरबाजार परतवाडा शहरासाठी असलेला बायपास ला सुद्धा तात्काळ प्राधान्य देण्याची मागणी करण्यात आली.
शकुंतला रेल्वे सुरू करा
इंग्रज कालीन शकुंतला रेल्वे इतिहास जमा होण्यापूर्वी तिचे पुनर्जीवन करून गोरगरिबांसाठी महत्त्वाची असलेली ही रेल्वे सुरू करण्याची मागणी सुद्धा बच्चू कडू (Bachu Kadu) यांनी यावेळी केली कार्यकाळातील राहिलेले अनेक विषय पूर्ण करण्याची धावपळ कायम ठेवीत विकासात्मक कामात राजकारण नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी ना. गडकरी (Nitin Gadkari) यांची भेट घेऊन चांदूरबाजार अचलपूर तालुक्यातील समस्या मांडल्या