Gadchiroli :- गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अवकाळी पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यातील शेतकर्यांच्या शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतामध्ये उभे असलेले धान, तूर, सोयाबीन, भाजीपाला आदी पिके पावसामुळे आडवी झाली असून अनेक ठिकाणी पिकांचे संपूर्ण नुकसान झाले आहे.
तातडीने नुकसानभरपाई देण्याची आ. रामदास मसराम यांची मागणी
त्यामुळे शेतकरी(Farmer) आर्थिक अडचणीत सापडला आहे.या पार्श्वभूमीवर आ. रामदास मसराम यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधून तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकर्यांना त्वरीत नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. तसेच जिल्ह्यातील चारही तालुक्यांतील तहसीलदारांना यासंदर्भात तातडीने पंचनामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
तहसीलदार, कृषी अधिकारी व महसूल विभागाचे (Revenue Division) कर्मचारी यांनी गावागावात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानग्रस्त पिकांचे योग्य पंचनामे तयार करावेत, असे निर्देश आ. मसराम यांनी दिले आहेत. शेतकरी हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्याचे रक्षण करणे ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे.
प्रशासनाकडून पंचनामे प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली असून, लवकरच शेतकर्यांना मदत मिळेल, अशी अपेक्षा आ. मसराम यांनी व्यक्त केली आहे.




