- कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. संदीप कन्हाळे यांचे प्रतिपादन,
आंबा महोत्सवास उत्स्फुर्त प्रतिसाद
गडचिरोली (Gadchiroli ) :- आंबा हा फळांचा राजाअसून आंब्याची ( mangoes ) लागवड संपूर्ण जगात तसेच भारतातही मोठ्या प्रमाणात केली जाते. आंब्याच्या फळामध्ये जीवनसत्व अ, जीवनसत्व क, तंतुमय पदार्थ, तसेच सोडियम आणि पोटाशियम (sodium and potassium) ही खनिजे मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे आरोग्याच्या दृशीने सुद्धा हे फळ पिक अतिशय चांगले आहे. त्याचे नितमित सेवन केल्यास आपले आरोग्य सुदृढ राहील. त्यामुळे बाजारपेठेत आंब्याची (Mangoes in the market) मागणी पाहता गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आंबा पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात करावी असे प्रतिपादन कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख, डॉ. संदीप कन्हाळे यांनी केले.कृषी विज्ञान केंद्रात (Agricultural Science Centre) आज २२ मे रोजी आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कृषी संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. युवराज खोब्रागडे, (Dr. Yuvraj Khobragade,) माविमचे जिल्हा समन्वयक विष्णुपंथ झाडे, एकात्मिक बाल विकास प्रकल्प (Integrated Child Development Project) अधिकारी ज्योती कडू, सहाय्यक प्रा. निलीमा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते मार्गदर्शन करतांना डॉ. युवराज खोब्रागडे यांनी उपस्थितांना आंबा लागवडीचे आधुनिक तंत्रज्ञान या विषयावर सखोल मार्गदर्शन करतांना सांगितले की शेतकऱ्यांनी धान पिकाबरोबरच आंबा पिकाची सुद्धा सघन पद्धतीने लागवड करावी व आपले आर्थिक स्थैर्य उंचवावे असे आवाहन केले. माविमचे जिल्हा समन्वयक झाड यांनी उपस्थित शेतकरी बंधू भगिनींना आंबा पिकाचे व्यापारीदृष्ट्या महत्व सांगतांना कृषि विज्ञान केंद्राच्या या उपक्रमाची स्तुती केली व अशा प्रकारच्या महोत्सवांचे आयोजन कृषि विज्ञान केंद्रात नियमित करण्यात यावेत अशी इच्छा व्यक्त केली. बाल विकास प्रकल्प अधिकारी ज्योती कडू, यांनी आंब्याच्या प्रक्रियायुक्त पदार्थांचे महत्व विषद करतांना सांगितले की आंब्यापासून तयार केलेल्या आमरस, (Amras) पन्हा, लोणचे, मुरब्बा, टॉफी, कॅन्डी इत्यादी पदार्थांना बाजारपेठेत मोठी मागणी असल्यामुळे महिलांनी बचत गटांच्या माध्यमातून आंब्याचे विविध प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करून आपली आर्थिक स्थिती सुधारावी असे आवाहन उपस्थित महिला शेतकऱ्यांना केली.
प्रा. निलिमा पाटील (Prof. Nilima Patil) यांनी आंब्याच्या विविध प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करण्याची पाककृती समजावून सांगितली. कार्यक्रमाचे संचालन निलिमा पाटील यांनी केले तर आभार पुष्पक बोथिकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सूचित लाकडे, पुष्पक बोथिकर, डॉ. प्रीतम चिरडे, नरेश बुधवार, सुनिता थोटे, अंकुश ठाकरे, शशिकांत सलामे, हितेश राठोड यांनी सहकार्य केले.
विविध आंब्यांच्या स्टॉलनी वेधले लक्ष
महोत्सवामध्ये (festival) गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिक वाण तसेच महाराष्ट्रातील उत्पादित सुधारित आंब्याचे वाण लंगडा, दशेरी, तोतापुरी, रत्ना, हापूस, लालबाग, पायरी, मंजिरी, आम्रपाली, मल्लिका, केशर, बनेशान, कलेक्टर इत्यादी प्रदर्शनीमध्ये ठेवण्यात आले होते. आंबा महोत्सव प्रदर्शनीला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.