कोरची (Gadchiroli) :- मागील काही वर्षांपासून विद्युत विभागाच्या ढिशाळ कारभारामुळे सामान्य जनतेसोबत शेतकऱ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत असून जगाचा आता हाता तोंडाशी आलेला घास हिरावत असल्यामुळे हवालदिल झाला असल्याचे दिसून येत आहे. भार नियमन करून सुद्धा विद्युत विभागातर्फे (Electrical Division) अत्यंत कमी दाबाचा विद्युत पुरवठा करण्यात येत असल्यामुळे नागरिकांचे महागडे उपकरण निकामी होत असून यामुळे सामान्य जनतेला भुर्दंड बसत असल्याचे दिसून येत आहे. तसेच विद्युत विभागाशी निगडित असलेल्या दुकानदारांनी व्यवसाय करावे तरी कसे? असा प्रश्न उत्पन्न होत आहे.
जगाच्या पोशिंदावर उपासमारीची पाळी
तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी सौर ऊर्जा (Solar energy) कृषी पंपासाठी महागडे डिमांड भरले परंतु मागील कित्येक महिन्यांपासून या ग्राहकांना मिळाले फक्त तारीख पे तारीख. काही शेतकऱ्यांनी वेळेवर सौरपंप लावून देण्यात येईल या आश्वासनावर रबी पीक सुद्धा घेतले परंतु आता या शेतकऱ्यांचे पीक करपू लागल्याने आपल्या अख्ख्या आयुष्याची कमाई आपल्या शेतावर लावणारा शेतकरी (Farmer)हवालदिल झाला असून आपल्यापरिवाराचे उदरनिर्वाह करायचे तरी कसे? असा प्रश्न सदर शेतकऱ्यांच्या मनामध्ये उत्पन्न होत आहे.