कोरची (Gadchiroli) :- काँग्रेस पक्षात आता बंडखोरांना स्थान नाही असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (Congress) कमिटीचे उपाध्यक्ष तथा गडचिरोली जिल्ह्याचे निरीक्षक एड. सचिन नाईक यांनी केले. पुढे बोलताना नाईक म्हणाले की राज्यातील सामान्य जनतेत जाऊन त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम केल्याशिवाय काँग्रेस पक्षाला उभारी देता येणार नाही. हे ध्येय धोरण समजून काँग्रेस पक्षांनी पुढाकार आणि राज्यात पुन्हा नव्याने काँग्रेस निर्माण करण्याची भूमिका ठेवून वेगवेगळ्या जिल्ह्यात निरीक्षक म्हणून पाठवण्याचे काम प्रदेशअध्यक्षांनी केले आहे. यात अनेक राज्यांचे व जिल्ह्याचे स्थानिकमुद्दे आहेत देशाचेही महत्त्वाचे मुद्दे आहेत. या सगळ्या स्तरावर आता गंभीरपणे काम करण्याची गरज असून त्याशिवाय राष्ट्राची निर्मिती होऊ शकणार नाही.
अनेक राज्यांचे व जिल्ह्याचे स्थानिकमुद्दे आहेत देशाचेही महत्त्वाचे मुद्दे
कोरची येथील बिरसा मुंडा सभागृहात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सूचनेनुसार तालुका काँग्रेसची आढावा बैठक शुक्रवारी आयोजित करण्यात आली होती यावेळी ते उद्घाटक या स्थानावरून बोलत होते. या बैठकीला आमदार रामदास मसराम, गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितेश राठोड, तालुका काँग्रेस अध्यक्ष मनोज अग्रवाल, जिल्हा महासचिव हकीमुद्दीन शेख, जिल्हा उपाध्यक्ष सदरुद्दीन भामानी, अनुसूचित जाती सेलचे जिल्हा अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, आरमोरी तालुका अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, वडसा तालुका अध्यक्ष राजेंद्र बुल्ले, नगराध्यक्ष सौ. हर्षलता भैसारे, माजी जिल्हा परिषद सदस्य रामसुराम काटेंगे, वडसा युवक काँग्रेस अध्यक्ष अमर भर्रे, पाणीपुरवठा सभापती धनराज मडावी, परमेश लोहंबरे, राजेश नैताम, श्रावण मातलाम, धनीराम हिडामी, प्रमिलाताई काटेंगे, कचेरीताई काटेंगे, नगरसेवक धरमसाय नैताम, नगरसेवक दिलीप मडावी, नगरसेविका कौशल्या केवास, बांधकाम सभापती तेजस्विनी टेंभुर्णे, माजी उपसभापती हेमंताताई शेंडे, युवक काँग्रेस अध्यक्ष दीपक हलामी, कांताराम जमकातन, महेश नरोटे, पंजाबराव उईके, जगदीश काटेंगे, सरपंच कुंती हुपुंडी आदि उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना आमदार रामदास मसराम म्हणाले की निवडणुकीत मोठे मोठे आश्वासन देऊन ही सरकार सत्तेत आली आहे. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ, धानाला पंचवीस हजार बोनस देऊ असे अनेक खोटे आश्वासन या सरकारने निवडणुकीपूर्वी दिले होते परंतु एकही आश्वासनाची पूर्तता या सरकारने केली नाही त्यामुळे या सरकारची पोलखोल घरोघरी जाऊन करण्याची गरज आहे.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी येणाऱ्या निवडणुकीत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसपक्ष आपला झेंडा फडकवणार यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे असे आवाहन केले. कार्यक्रमाचे संचालन माजी जिल्हा परिषद सदस्य रामसुराम काटेंगे यांनी केले, प्रास्ताविक तालुका अध्यक्ष मनोज अग्रवाल यांनी केले व आभार राजेश नैताम यांनी मानले. याप्रसंगी तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्य संख्येने उपस्थित होते.