हिंगोली (Hingoli Municipality) : शहरातील १७ प्रभागामधील कचरा उचलणे व त्याच्या वाहतुकीचे कंत्राट अमरावती येथील बेरोजगार क्षितीज नागरीक सेवा सहकारी संस्थेला दिले असून त्यावर जवळपास १५० कंत्राटी कामगार काम करीत आहेत. (Hingoli Municipality) मागील १५ महिन्यापासून संस्थेचे जवळपास ५ कोटी रूपर्य देयके थकल्याने शनिवार पासून कचरा उचलण्यास नकार देण्यात आला आहे.
कंत्राटदाराचे नगर पालिकेकडे थकले ५ कोटी रूपये
हिंगोली शहरामध्ये (Hingoli Municipality) १७ प्रभाग असून या प्रभागातील कचरा उचलणे व त्याच्या वाहतुकीचे कंत्राट अमरावती येथील बेरोजगार क्षितिज नागरीक सेवा सहकारी संस्थेला देण्यात आले आहे. सन २०२२ पासून या संस्थेतर्फ स्वच्छतेची कामे करूनडपींग ग्राऊंडवर हा कचरा नेवून टाकला जातो. या स्वच्छतेच्या कामाकरीता शहरात २२ घंटागाड्या असून त्यावर ४४ कंत्राटी कामगार व ५ ट्रैक्टर २५ कर्मचारी तसेच ६० स्वच्छता कर्मचारी व इतर पर्यवेक्षक असे जवळपास १५० कामगार कार्यरत आहेत. या कामगारांना संस्थेकडून वेतन दिले जाते. त्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून घनकचरा व्यवस्थापनाचा निधी मिळणे आवश्यक आहे. मागील १५ महिन्यापासून केंद्र व राज्य शासनाकडून निधी देण्यात आला नाही.
अनेकवेळा निवेदन देऊन सुद्धा देयके निघालेच नाहीत
त्यामुळे संस्थेचे जवळपास ५ कोटी रूपये देयके थकले आहेत. या (Hingoli Municipality) संदर्भात कंत्राटदाराने अनेक वेळा नगर पालिकेकडे पत्र देऊनही देयके उपलब्ध होत नाहीतः परंतु कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांकडून कंत्राटदाराकडे वेळोवेळी तगादा लावला जात असल्याने संस्थेने त्यांच्या जवळील निधीतून कामगारांचे वेतन अदा केले: परंतु आता संस्थेकडेही कामगारांच्या वेतनासाठी पैसे उपलब्ध नाही. परिणामी काही कामगारांनी काम सोडल्यामुळे त्याचा परिणाम दैनंदिन कामावर जाणवत आहे. मंजुराचे वेतन करण्यासाठी व वाहनातील डिझेल पुरवठा करण्याकरीता संस्थेकडे पैसे नाहीत. परिणामी
कर्मचाऱ्यासह त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. त्यामुळे ५ कोटी रुपयांच्या थकीत देयकापोटी (Hingoli Municipality) पालिकेकडून एक रुपया देखील न मिळाल्यामुळे कंत्राट दराने घंटा गाड्या बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता पालिकेने कंत्राट न देता पालिकेच्या घंटागाड्याद्वारे कचरा उचलण्याचा निर्णय घेतला आहे. या घंटागाड्यावर हेल्पर नसणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आपला दैनंदिन निर्माण होणारा घरगुती ओला, सुका व घातक कचरा विलगीकरण करून तो स्वतः घंटागाडीत टाकून नगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
यापूर्वी आ. मुटकुळेंनी केली होती शिष्टाई
विधानसभा निवडणुकीपूर्वीच कंत्राटदाराने स्वच्छतेचे काम देयकाअभावी थांबविण्याचा निर्णय घेतला होता; परंतु आ. तान्हाजी मुटकुळे यांनी कंत्राटदाराशी चर्चा करून शासनदरबारी देयकाकरिता पाठपुरावा केला होता; परंतु शासनाकडून १५ व्या वित्त आयोगाचा निधी अप्राप्त झाल्यामुळे शेवटी कंत्राटदाराने १ एप्रिलपासून काम थांबविण्याचा निर्णय घेतल्यामुळे भविष्यात स्वच्छतेबाबत शहरामध्ये पेचप्रसंग उद्भवणार
नगर पालिकेवर स्वच्छतेचा ताण पडणार
हिंगोली शहरामध्ये यापूर्वी संबंधित संस्थेच्या माध्यमातून घंटागाडीद्वारे नागरिकाच्या घरातील कचरा जमा करून त्याचे विलगीकरण केल्यानंतर डम्पींग ग्राऊंडवर टाकला जात होता. कंत्राटदाराच्या देयकामुळे त्याने काम थांबविण्याचा निर्णय घेतल्यामुळे आता (Hingoli Municipality) नगर पालिकेवर स्वच्छतेचा चांगलाच ताण पडणार आहे. नागरिकांच्या घरासमोर घंटागाडी जाईल; परंतु नागरिकांनी त्या घंटागाडीमध्ये कचरा टाकावा लागणार असल्याने भविष्यात वाद उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही.