किरकोळ व अर्जित रजेवर गेलेल्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना तात्काळ हजर राहण्याचे आदेश!
हिंगोली (Hingoli) : कश्मीर मधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी 27 निरपराथ पर्यटकांची गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेचा सर्व स्तरातून निषेध नोंदविला जात असताना, भारतीय सैन्य दलाने 7 मे रोजी पाकिस्तान मधील नऊ दहशतवादी ठिकाणांवर ऑपरेशन सिंदुर च्या माध्यमातून हल्ला चढविला. त्यामुळे भविष्यात दहशतवाद्याकडून (Terrorist) देशातील महत्त्वाच्या स्थळांना लक्ष करून हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने हिंगोली जिल्हा पोलीस दलातील (Hingoli District Police Force) किरकोळ व अर्जित रजेवर गेलेल्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना तात्काळ दहा मे रोजी कर्तव्यावर हजर राहण्याबाबतचे आदेश प्रभारी पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांनी काढले आहेत.
खबरदारीच्या दृष्टिकोनातून सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त!
भारतीय सैन्याने (Indian Army) 7 मे रोजी पाकिस्तानमधील 9 दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर ऑपरेशन सिंदूरच्या (Operation Sindoor) माध्यमातून हल्ला चढवल्याने आता युद्धजन्य परिस्थिती (War Situation) निर्माण झाली आहे. त्यातच पाकिस्तान कडून सुद्धा भारतावर हल्ले चढविले जात आहे. या पृष्ठभूमीवर दहशतवाद्यांकडून देशात महत्त्वाच्या स्थळांना लक्ष करून हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच सध्या भारतामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असल्याने या घटनेच्या अनुषंगाने खबरदारीच्या दृष्टिकोनातून सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त (Police Arrangement) लावण्याच्या सूचना शासन (Government) स्तरावरून देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात कुठेही अनुचित घटना घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांना मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे. यासाठी जे पोलीस अधिकारी व कर्मचारी किरकोळ किंवा अर्जित रजेवर गेले आहेत. त्यांना तात्काळ 10 मे रोजी कर्तव्यावर हजर राहण्याबाबतचे आदेश प्रभारी पोलिस अधीक्षक अर्चना पाटील यांनी काढले आहेत. त्यामुळे रजेवर गेलेल्या पोलीस अधिकारी (Police Officer) व कर्मचाऱ्यांना आता कर्तव्यावर उपस्थित रहावे लागणार आहे.