ICC Champions Trophy 2025 Pakistan :- पाकिस्तान आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे आयोजन करत आहे, परंतु ही स्पर्धा हायब्रिड मॉडेल अंतर्गत आयोजित केली जात आहे. सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय संघ दुबईत (Dubai)आपले सामने खेळत आहे. 24 फेब्रुवारी रोजी न्यूझीलंड संघाने बांगलादेशचा 5 गडी राखून पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. या सामन्यात असे काही घडले, ज्यानंतर पाकिस्तानची सुरक्षा यंत्रणा जगासमोर आली.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 वर दहशतवादी सावली!
पाकिस्तानमध्ये खेळल्या जात असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान मोठ्या सुरक्षेच्या उल्लंघनात, न्यूझीलंड (New Zealand) आणि बांगलादेश (Bangladesh)सामन्यादरम्यान इस्लामी राजकीय पक्षाचा कथित समर्थक मैदानात घुसला. न्यूज एजन्सी एपीच्या मते, तहरीक-ए-लब्बैक (टीएलपी) नेता साद रिझवीचे छायाचित्र घेऊन आलेला घुसखोर न्यूझीलंडचा क्रिकेटर रचिन रवींद्रच्या जवळ येऊन त्याला मिठी मारण्यात यशस्वी झाला, ज्यामुळे किवी फलंदाजही संतापला. स्टेडियममध्ये न्यूझीलंडच्या प्रेक्षकांसमोर रचिन आणि टॉम लॅथम यांच्यासोबत धावांचा पाठलाग करताना ही घटना घडली. या सामन्यात रवींद्रने शानदार शतक झळकावत न्यूझीलंडच्या बांगलादेशवर पाच विकेट्सने विजय मिळवण्यात मोलाचा वाटा उचलला. या सामन्यातील विजयासह न्यूझीलंडने उपांत्य फेरीत प्रवेश केला.
रचिनने रवींद्रला मारली मिठी
न्यूझीलंड संघाने सामना जिंकला, पण यादरम्यान मैदानावरील प्रेक्षकाने रचिन रवींद्रवर हल्ला केला. तेव्हापासून सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, पाकिस्तानच्या इंटेलिजन्स ब्युरोने चॅम्पियन्स ट्रॉफीला उपस्थित असलेल्या परदेशी पाहुण्यांचे खंडणीसाठी अपहरण करण्याच्या कथित कटाबद्दल हाय अलर्ट (High Alert) जारी केला आहे. तहरीक-ए तालिबान पाकिस्तान (TTP), ISIS सह अनेक दहशतवादी संघटनांविरोधात अलर्ट जारी करण्यात आला आहे. चीन आणि अरब देशांतील नागरिकांना लक्ष्य करण्याचा विचार करत असल्याचे सांगण्यात आले. दहशतवादी गट ISKP शहराच्या बाहेरील भागात जेथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले नाहीत तेथे भाड्याने घरे घेण्याची योजना आखत आहे.
2009 मध्ये श्रीलंकेवर झाला होता दहशतवादी हल्ला
2009 मध्ये लाहोरमध्ये श्रीलंकेच्या क्रिकेट संघावर दहशतवादी हल्ला झाला होता. यावेळी, श्रीलंकेचा(Sri Lanka) संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर होता आणि दोन्ही संघ दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार होते. पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिला आणि दुसरा सामना लाहोरमध्ये खेळला गेला, खेळाच्या तिसऱ्या दिवशी श्रीलंकेचा संघ हॉटेलमधून गद्दाफी स्टेडियमकडे जात असताना डझनभर मुखवटाधारी दहशतवाद्यांनी बसवर हल्ला केला. या हल्ल्यात श्रीलंका संघाचा कर्णधार महेला जयवर्धने, कुमार संगकारा, अजंथा मेंडिस, थिलन समरवीरा, थरंगा परनाविताना आणि चामिंडा वास जखमी झाले आहेत. हल्ल्यानंतर श्रीलंकेचा संघ दौरा अर्ध्यावर सोडून मायदेशी परतला.