हिंगोली (Hingoli):- नवनिर्वाचित खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगाम २०२४ ची आढावा बैठक १२ जूनला घेण्यात आली असता शेतकऱ्यांच्या वाढत्या तक्रारीमुळे त्यांनी कृषी विभागाच्या (Department of Agriculture) अधिकाऱ्यांची झाडाझडती केली.
हिंगोलीत खरीप हंगामाच्या बैठकीत खासदार नागेश पाटील आष्टीकरांचा अल्टिमेट
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात १२ जूनला सायंकाळी ५ वाजता खा. नागेश पाटील आष्टीकर यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगामाची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कदम यांच्यासह इतर अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. मंगळवारी नुकताच पाऊस झाला. असाच पाऊस (Rain)पुन्हा झाल्यास पेरण्या सुरू होतील. तत्पूर्वी पेरण्यासाठी शेतकऱ्यांना बी-बियाणे व खत घेताना लिकींगचा प्रकार चालू आहे तसेच काही ठिकाणी दरवाढ करून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्यांची पिळवणूक करू नये अशी तंबी खा.आष्टीकरांनी देऊन देऊन यापूर्वी जे झाले ते झाले परंतु आता भविष्यात शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. त्यांच्यावर निश्चित कारवाई (action) केली जाणार ही कारवाई न झाल्यास मी स्वतः उभारून कारवाई करण्यास भाग पाडेल अन्यथा संबंधित अधिकाऱ्यावर देखील कारवाई करण्याचा इशारा खासदार आष्टीकरांनी दिला. तसेच खरीपाच्या पेरणीसाठी लागणारे बी- बियाणे(seed) व उपलब्ध असलेल्या खताचा आढावा घेण्यात आला.