भारत-पाकिस्तान युध्द!
हिंगोली (India-Pakistan War) : कश्मीरमधील पहलगाम येथील हल्ल्याचा बदला घेण्याकरीता भारतीय सैन्याने (Indian Army) अतिरेक्यांच्या लष्करी तळावर जोरदार हल्ला चढविला. त्यामुळे पाकिस्ताननेही भारतावर क्षेपनास्त्राद्वारे हल्ला (Missile Attack) चढविला आहे. भारत-पाकिस्तानमध्ये युध्द सुरु असल्याने भारतीय जवान सुखरुप रहावे यासाठी हिंगोली शहरातील भट्ट कॉलनीमधील महिलांनी शनिवारी कुबरेश्वर महादेवाला साकडे घातले.
पहलगाम येथे निष्पाप 27 पर्यटकांना अतिरेक्यांनी गोळ्या घालून ठार केले होते. त्याचा बदला भारतीय सैन्यांनी सिंदूर ऑपरेशनच्या (Operation Sindoor) माध्यमातून घेतला आहे. पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या 9 अड्ड्यांवर क्षेपनास्त्राद्वारे हल्ला चढवून काही अतिरेक्यांना कंठस्थानी घातले. तसेच हे अतिरेकी अड्डे उध्दवस्त केले. पाकिस्तानमधील अतिरेकी अड्डे उधवस्त केल्याने पाकिस्तानने देखील भारताला प्रत्युत्तर देवून क्षेपनास्त्राद्वारे हल्ले सुरु केले आहेत. विशेष म्हणजे या ऑपरेशन सिंदूरची माहिती रणरांगीनी कर्नंल सोफिया कुरेशी (Colonel Sophia Qureshi) व विंग कंमाडर व्योमीका सिंग (Wing Commander Vyomika Singh) ह्या वेळोवेळी देत आहेत.
कुबेश्वर महादेवाची पुजा-अर्चा करून साकडे घालण्यात आले!
भारत-पाकिस्तानमध्ये (India-Pakistan War) युध्द सुरु असल्याने भारतीय जवान सुरक्षित राहावे यासाठी हिंगोली शहरातील भट्ट कॉलनीतील कुबेश्वर परिवाराच्या वतीने 10 मे रोजी सकाळच्या सुमारास कुबेश्वर महादेवाची (Kubeshwar Mahadev) पुजा-अर्चा करून साकडे घालण्यात आले. यानंतर उपस्थित महिला, पुरुष, युवक, युवती यांनी हातामध्ये भारतीय ध्वज (Indian Flag) घेवून घोषणा दिल्या. तसेच पाकिस्तान अतिरेक्यांच्या माध्यमातून चढवित असलेल्या हल्ल्यामुळे निषेध नोंदविण्यात आला.