देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: भारतीय निवडणूक प्रक्रियेचे परदेशी शिष्टमंडळाकडून कौतुक
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > महाराष्ट्र > भारतीय निवडणूक प्रक्रियेचे परदेशी शिष्टमंडळाकडून कौतुक
महाराष्ट्रराजकारणविदेश

भारतीय निवडणूक प्रक्रियेचे परदेशी शिष्टमंडळाकडून कौतुक

Deshonnati Digital
Last updated: 2024/05/09 at 5:29 PM
By Deshonnati Digital Published May 9, 2024
Share

मुंबई: भारतासारख्या लोकशाही देशात निवडणूक प्रक्रिया ही खूप महत्त्वपूर्ण बाब आहे. येथील मतदारांचा स्वयंप्रेरीत मतदानासाठीचा उत्साह आणि त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हे आयोगामार्फत राबवण्यात आलेल्या मतदान जागृती कार्यक्रमाचे यश असून मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक आयोगाने उत्कृष्ट नियोजन केल्याचे मत निवडणूक प्रक्रियेच्या पाहणीसाठी आलेल्या परदेशी शिष्टमंडळांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केले.

भारत निवडणूक आयोगाने इतर देशांच्या निवडणूक व्यवस्थापन संस्थांबरोबर आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि सहभागासाठी आइव्हीपी कार्यक्रम आयोजित केला आहे. त्या अंतर्गत परदेशी शिष्टमंडळ प्रतिनिधी निवडणूक प्रक्रियेच्या पाहणीसाठी महाराष्ट्रात आलेले आहेत. रायगड येथील मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रियेची पाहणी केल्यानंतर या शिष्टमंडळाने आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांची भेट घेऊन भारतातील निवडणूक प्रक्रियेविषयी माहिती जाणून घेतली. त्यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

या शिष्टमंडळात बांगलादेश, श्रीलंका, कझाकिस्तान आणि झिम्बाबाब्वे या देशातील प्रतिनिधींचा समावेश आहे. यात बांगलादेशमधील निवडणूक आयोगातील अधिकारी महम्मद मोनिरुइझमन टी, जी एम शाहताबुद्दीन, कझाकिस्तान केंद्रीय निवडणूक आयोगातील नुरलान आब्दीरोव, आयबक झिकन, श्रीलंकेच्या निवडणूक आयोगाच्या सिलया हिलक्का पासिलिना आणि झिम्बाब्वे निवडणूक आयोगाच्या सिम्बराशे तोंगाई आणि न्यायमूर्ती प्रशिला चिगुम्बा यांचा शिष्टमंडळात समावेश आहे. यावेळी राज्याचे विशेष निवडणूक निरीक्षक धर्मेंद्र एस. गंगवार, विशेष निवडणूक पोलीस निरीक्षक एम.के.मिश्रा, सहसचिव मनोहर पारकर, अवर सचिव भास्कर बनसोडे, योगेश गोसावी उपस्थित होते.

शिष्टमंडळातील प्रतिनिधींनी यावेळी मतदान केंद्रावरील पाहणीबाबत आपला अनुभव व्यक्त करताना येथील मतदारांची मोठी संख्या लक्षात घेता त्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रावरील सुव्यवस्था, सुरळित सुरु असलेली मतदान प्रक्रिया ही निश्चितच यंत्रणेच्या तयारीचे यश असल्याचे सांगितले. तसेच भारतात तरुण मतदार मोठ्या प्रमाणात असून मतदान केंद्रावर तरुण मतदार त्याच सोबत सर्व वयोगटातील मतदारांचा उत्साह मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळाला. विशेषतः मतदारांच्या चेहऱ्यावर मतदान करण्याचा असलेला आनंद हा एखाद्या सणात सहभागी झाल्यासारखा होता असे या प्रतिनिधींनी आवर्जून सांगितले. या सगळ्यांतून मतदारांचा मतदान प्रक्रियेवर असलेला विश्वास ठळकपणे दिसून आला. मतदारांसोबतच येथील मतदान केंद्रावरील बुथ प्रतिनिधी देखील माहितीगार असल्याचे समाधान सुद्धा प्रतिनिधींनी यावेळी व्यक्त केले.

एस.चोक्कलिंगम यांनी भारतातील निवडणूक प्रकिया पारदर्शक, निर्भय वातावरणात पार पाडण्याला निवडणूक आयोगाचे प्रथम प्राधान्य आहे. त्यादृष्टीने सर्व संबंधित यंत्रणा कार्यरत असून महाराष्ट्रात आतापर्यंत तीन टप्प्यात झालेली मतदान प्रक्रिया सुव्यवस्थित, शांततापूर्ण पद्धतीने यशस्वीरित्या पार पडली असल्याची माहिती त्यांनी दिली. निवडणूक प्रक्रियेत पैश्यांचा, बळाचा कुठल्याही प्रकारचा गैरवापर कुणाकडूनही केल्या जाऊ नये यासाठी कटाक्षाने लक्ष ठेवण्याच्या आयोगाच्या सूचना आहेत. त्यानुसार सर्व आवश्यक यंत्रणांना नियुक्त करण्यात आलेले आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे आणि कायदेशीर मार्गाने पार पाडण्यासाठी विविध संबंधित यंत्रणांना जबाबदारी निश्चित करण्यात आली असून ठिकठिकाणी तपासणी नाके, भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. उमेदवाराच्या प्रचारापासून ते मतदान झाल्यानंतर ईव्हीएम मशीन, स्ट्रॉंग रूममध्ये सुरक्षित ठेवल्या जाईपर्यंत सर्व प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून कुठल्याही प्रकारचे गैरकृत्य करणाऱ्यांवर कडक कारवाई केल्या जाते. त्यामुळे सर्व प्रक्रिया ही नियंत्रणात असून यशस्वीरित्या शांततापूर्ण मतदान पार पडत आहेत, असे सांगून ईव्हीएम मशीनची सुरक्षा, तपासणी, मतदान केंद्रावरील सुरक्षा व्यवस्था, बुथ प्रतिनिधींची नियुक्ती, स्ट्राँग रूम सील करने यासर्व बाबींची सविस्तर माहिती यावेळी श्री.चोकलिंगम यांनी दिली.

You Might Also Like

CM Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २९ मे रोजी हिंगोलीत

Shiv Sena Tiranga Rally: शिवसेनेच्या तिरंगा बाईक रॅलीने परभणीकरांचे वेधले लक्ष

Tiranga Rally: वीर जवानांनाच्या सन्मानार्थ देशभक्तीचा अभूतपूर्व जागर करीत भर पावसात भव्य तिरंगा रॅली

CM Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना बियाणे आणि खते याचा तुटवडा भासणार नाही.

India-Pakistan Tension: भारत सरकारची पाकिस्तानविरुद्ध मोठी कारवाई…

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani : परभणी शहरात बाजारपेठ कडकडीत बंद; जागोजागी पोलिस बंदोबस्त तैनात

Deshonnati Digital Deshonnati Digital December 16, 2024
Hingoli : शिवजयंतीनिमित्त बुधवारी ‘जय शिवाजी, जय भारत पदयात्रा’; जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन
kanhan Tiger Death: सिहोरा, वाघधरे वाडीमध्ये धुमाकुळ घालणा-या वाघाचा मुत्यु
Himachal Floods: मुसळधार पावसामुळे भूस्खलन, पूर-पावसाचा कहर; 38 रस्ते बंद, 30 लोक बेपत्ता
Arjuni Assembly Constituency: अर्जुनी मोर विधानसभा क्षेत्रासाठी पोलीस निरीक्षक तरुण जोशी यांची नियुक्ती
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

CM Devendra Fadnavis
मराठवाडाराजकारणहिंगोली

CM Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २९ मे रोजी हिंगोलीत

May 22, 2025
Shiv Sena Tiranga Rally
मराठवाडापरभणीराजकारण

Shiv Sena Tiranga Rally: शिवसेनेच्या तिरंगा बाईक रॅलीने परभणीकरांचे वेधले लक्ष

May 22, 2025
Tiranga Rally
विदर्भगडचिरोलीराजकारण

Tiranga Rally: वीर जवानांनाच्या सन्मानार्थ देशभक्तीचा अभूतपूर्व जागर करीत भर पावसात भव्य तिरंगा रॅली

May 22, 2025
CM Devendra Fadnavis
Breaking Newsमहाराष्ट्रमुंबईराजकारणशेती

CM Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना बियाणे आणि खते याचा तुटवडा भासणार नाही.

May 22, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?