जळकोट (Jalkot Bike Accident) : जळकोट येथे नांदेड ते उदगीर राष्ट्रीय महामार्गावर, दुचाकीचा अपघात झाला आहे. त्यात जळकोट तालुक्यातील पाटोदा येथील दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून महामार्गावरील वाढलेल्या अपघाताविषयी चिंता व्यक्त केली जात आहे.
सविस्तर वृत्त असे की, रामेश्वर माधव गोरखे वय वर्षे 24 राहणार पाटोदा (बु. ) ता. जळकोट आणि गिरीष बालाजी कांबळे वय 26 (नळेगाव) हल्ली मुक्काम पाटोदा (बु) ता. जळकोट हे (Jalkot Bike Accident) दोन तरुण मोटारसायकलवरून आपल्या गावाकडे सायंकाळी साडे चार च्या सुमारास आपल्या गावाकडे पाटोदा बुद्रुक कडे जत असताना अपघात झाला.
या वेळी दोघेही रस्त्याच्या कडेला गंभीर अवस्थेत पडलेले होते. (Jalkot Bike Accident) रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनी त्यांना पडलेले पाहून त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, गिरीश कांबळे याचा जाग्यावरच मृत्यू झाला होता आणि दुसरा तरुण रामेश्वर गोरखे याचा उदगीर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारदरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे गावातून हळहळ व्यक्त होत आहे.




