परभणीच्या जिंतूर शहरातील जिजाऊ चौकातील घटना
परभणी/जिंतूर (Jintur Crime Case) : तालुक्यातील बोरी येथून ट्रक मधील माल खाली करून जिंतूर शहरात येणाऱ्या ट्रकवर अचानक दगडफेक करून ट्रक अडवण्यात आला, यावेळी अज्ञात चार ते पाच जणांना चालकास मारहाण करून रोख रक्कम लांबवल्याची घटना दिनांक 2 एप्रिल रोजी रात्री 11:30 च्या सुमारास घडली. मात्र (Jintur Crime Case) घटनेची फिर्याद अद्यापही घेण्यात आली नसून, पोलीस टाळाटाळ करत असल्याचा आरोप ट्रक चालक करत आहे.
पोलिसांची फिर्याद घेण्यास टाळाटाळ
याबाबत अधिक माहिती अशी की,जिंतूर तालुक्यातील शेवडी येथील चालक विष्णू बाबाराव घुगे हे ट्रक क्र. MH 26 BE 9272 घेऊन बोरी येथील व्यापाऱ्यांचा माल खाली करून शहरात येत असताना परभणी रोडवरील जिजाऊ चौक येथे तीन ते चार मोटारसायकल वरून आलेल्या अज्ञात पाच ते सहा जणांनी धावत्या ट्रकवर दगड मारून ट्रक अडवण्यात आला. यावेळी (Jintur Crime Case) धावत्या ट्रकवर झालेल्या अचानक हल्ल्यामुळे गोंधळून गेलेल्या चालकाने ट्रक थांबवला. यावेळी अज्ञात व्यक्तींनी ट्रकवर चढून चालकास लाथा बुक्यांनी मारहाण करत रोख 40 ते 45 हजार रुपये काढून पोबारा केला.
यावेळी गोंधळलेल्या चालकाने रात्रीला पोलीस ठाणे गाठून फिर्याद देण्याच्या प्रयत्न केला मात्र यावेळी पोलिसांनी सकाळी पाहणी करून गुन्हा दाखल करण्याचे सांगितले मात्र सकाळी व दुपारी पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांकडून फिर्याद घेण्यास टाळाटाळ करत असल्याचे चालकांने सांगितले. दरम्यान मागील काही दिवसांपासून तालुक्यासह चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून चोऱ्यांचा शोध अद्यापही लागलेला नसताना नागरिक भयभीत झाले आहेत. यातच काल रात्री धावत्या ट्रकवर हल्ला करून चालकास लुटले आहे. मात्र (Jintur Crime Case) एवढया गंभीर प्रकाराकडे पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ होत असेल तर नागरिकांनी गुणाकडे जावे असा सवाल उपस्थित होत आहे. म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करत आहेत.
मागील काही दिवसांपासून शहरात चोऱ्यांचे प्रमाणात वाढ झाली आहे. विशेष म्हणजे चोरटे रात्रीच्या सुमारास विविध कॉलनीमध्ये बिनधास्त फिरत असल्याचे सीसीटीव्ही फुटेच व्हायरल झाले. शिवाय काल भर बाजारपेठेतुन एका मोटारसायकलच्या डिक्कीतून दीड लाख चोरी (Jintur Crime Case) झाल्याची घटनाही सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसून येत आहे. मात्र पोलिसांकडून चोरट्यांचा शोध लागत नसल्यामुळे नागरिकांन मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.