कारंजा दारव्हा मार्गावरील घटना
कारंजा/ वाशिम (Karanja Accident) : भरधाव प्रवासी ऑटो पलटी झाल्याने घडलेल्या अपघातात 9 जण गंभीर जखमी झाले. (Karanja Accident) अपघाताची ही घटना शनिवारी कारंजा – दारव्हा मार्गावरील सोमठाणा फाट्यावरील गोलाई जवळ घडली. रूपाली अंबादास चव्हाण वय 42 वर्ष, ज्योती नाजूक वय 40 वर्ष, राधा भास्कर काळे वय 42 वर्ष, छबी नामदेव आडे वय 52 वर्ष, गणेश अरुण चौधरी वय 22 वर्ष, अंबादास रामजी चव्हाण वय 55 वर्ष, गोकर्णा बाबूसिंग राठोड वय 50 वर्षे, पंकज महादेव राठोड वय 25 वर्ष व सीमा मारुती कडू वय 52 वर्ष अशी जखमींची नावे असून, ते कारंजा तालुक्यातील जनुना येथील रहिवासी असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
भरधाव ऑटोवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ऑटो पलटी होऊन हा अपघात घडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (Karanja Accident) अपघाताच्या घटनेनंतर काहीजणांनी त्यांना उपचारासाठी कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आणि तेथील प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्यांना बाहेरगावी पाठविण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.