मुख्याधिकारी चिंचाळकर यांनी वसमतची ओळख केली जिवंत!
वसमत (Karanja Chowk) : वसमत येथील बंदकारंजा चौकातील बंद पडलेले कारंजा मुख्याधिकारी आशुतोष चिंचाळकर यांनी नगरपालिकेचा पदभार घेतल्यानंतर पुन्हा एकदा सुरू केले आहे शहरातील एकमेव असलेला हा कारंजा शहराची ओळख आहे ही ओळख मुख्याधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा जिवंत केली आहे कारंजामध्ये रंगीबेरंगी लाइटिंगसह पाण्याचे फवारे सुरू झाले आहेत रात्रीच्या वेळी अत्यंत मोहक असे दृश्य दिसत असल्याने शहरातील नागरिक महिला मंडळी कारंजा पाहण्यासाठी गर्दी करत आहेत व मुख्याधिकाऱ्यांनी केलेल्या कामाबद्दल धन्यवाद देत आहेत.
वैशिष्ट्यपूर्ण अनुदानातून तयार करण्यात आलेल्या या कारंजाचे वैशिष्ट्य!
वसमत शहरातील जुन्या नगरपालिका जवळील चौकात दहा-बारा वर्षांपूर्वी वैशिष्ट्यपूर्ण अनुदानातून शहर सुशोभीकरण मोहीमेअंतर्गत कारंजा तयार करण्यात आला होता. या कारंजामुळे शहराच्या वैभवात भर पडली होती. तेव्हापासून या चौकाला कारंजा चौक असे नाव पडले होते. वैशिष्ट्यपूर्ण अनुदानातून तयार करण्यात आलेल्या या कारंजाचे वैशिष्ट्य असे की लाखो रुपये खर्च करून उभा केलेला कारंजा फक्त नावापुरताच सुरू राहिला. कारंजा उभा राहिला यंत्रसामग्री बसली काही दिवस कारंजाचे फवारेही उडाले मात्र त्यानंतर त्यातील मशीन गायब झाल्या आणि कारंजा चौकाला “बंद कारंजा चौक” असे नाव पडले होते.
आजादी का अमृत महोत्सवच्या निमित्ताने या कारंज्याचा जीर्णोद्धार झाला!
तब्बल दहा-बारा वर्ष बंदपडलेला कारंजा तीन वर्षांपूर्वी आशुतोष चिंचाळकर यांनी मुख्याधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर, सुरू केला होता. आजादी का अमृत महोत्सव च्या निमित्ताने या कारंज्याचा जीर्णोद्धार झाला होता.
मुख्याधिकारी अशितोष चिंचाळकर जोपर्यंत मुख्याधिकारी म्हणून कार्यरत होते तोपर्यंत करंज्या सुरू राहिला होता त्यांची बदली होताच पुन्हा कारंजा बंद पडला होता.
कारंजाची माहिती घेतली आणि तातडीने कारंजा दुरुस्ती काम सुरू केले!
कारंज्याच्या चारी बाजूने फळविक्रेते भाजीपाला विक्रेते भाजीपाला विक्रेते यांचे गाडे रात्री आमलेट गाड्या आमलेटच्या गाड्यावर दारू पिनारांची गर्दी कारंजा चौकात सुरू झाली होती त्यामुळे कारंजा अडगळीत पडला होता. दरम्यान महिन्याभरापूर्वी पुन्हा एकदा मुख्याधिकारी म्हणून आशुतोष चिंचाळकर हे वसमत नगरपालिकेत रुजू झाले त्यांनी पदभार घेताच पुन्हा एकदा बंद पडलेल्या कारंजाची माहिती घेतली आणि तातडीने कारंजा दुरुस्ती काम सुरू केले आठ दिवसात पुन्हा एकदा कारंजा सुरू झाला आहे. मुख्याधिकारी आशुतोष चिंचाळकर व कर्मचाऱ्यांनी मेहनत घेऊन वसमतचा कारंजा चौकाला पूर्ववत वैभव प्राप्त करून दिले आहे. कधीकाळी शहराची ओळख असलेल्या कारंज्याचे थडगे झाले होते मुख्याधिकारी चिंचाळकर यांनी कारंजा चौकाला गतवैभव प्राप्त करून दिले आहे कारंजातून रंगीबेरंगी फवारे उडताना नागरिक सेल्फी काढत असल्याचे समाधानकारक चित्र आहे.
बंद पडलेला कारंजा सुरू केल्याने शहरातील नगरपालिकेचे एकमेव दिसणारे काम!
बंद पडलेला कारंजा सुरू केल्याने शहरातील नगरपालिकेचे एकमेव दिसणारे काम पुन्हा एकदा प्रकाशात आले आहे शहरातील नागरिकांना महिलांसाठी आणि बच्चे कंपनीसाठी विरंगुळा म्हणून हा कारंजा बसवण्यात आला होता मात्र तत्कालीन पदाधिकारी अधिकारी कर्मचारी यांनी या कारंजाला कमाईचे साधन समजून त्यावर दुरुस्तीवरच लाखोचा खर्च केला होता कारंजा मात्र काही सुरू झाला नव्हता त्याची कोणाला काळजीही वाटली नव्हती मात्र आता पुन्हा एकदा मुख्याधिकारी चिंचाळकर यांनी कारंजा सुरू केला आहे नागरिकात समाधानाचे वातावरण आहे.
चिंचाळकर आहेत तोपर्यंतच कारंजा आहे..
दहा-बारा वर्ष बंद पडलेला कारंजा मुख्याधिकारी चिंचाळकर यांनी तीन वर्षांपूर्वी सुरू केला होता दोन वर्ष कारंजा सुरू राहिला चिंचाळकर यांची बदली झाल्यानंतर पुन्हा कारंजा बंद पडला होता दोन वर्ष कारंजा बंद राहिला आणि वसमत नगरपालिकेत मुख्याधिकारी म्हणून पुन्हा एकदा आशुतोष चिंचाळकर यांची नियुक्ती झाली आणि बंद पडलेला कारंजा पुन्हा एकदा सुरू झाला आहे त्यामुळे वसमत शहरातील कारंजा जोपर्यंत आशुतोष चिंचाळकर हे मुख्याधिकारी आहेत तोपर्यंत चालणार त्यानंतर काही खरे नाही अशी भविष्यवाणी केली जात आहे




