अर्जुनी/मोरगाव (Gondia) :- तालुक्यातील नवेगाव/बांध पोलीस स्टेशन (Police Station)अंतर्गत येणाऱ्या उमरी/मुंगली व अर्जुनी/मोरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सावरटोला/बोरटोला येथे मुलांचे अपहरण करणारी टोळी सक्रिय असल्याची बातमी दि.29 जुलै व 30 जुलै रोजी प्रकाशित झाल्याने नवेगाव/बांध परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले.
पोलीसांनी केली सखोल चौकशी, अफवांवर विश्वास ठेवु नका
याची दखल घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनात अर्जुनी/मोर चे ठाणेदार पोलीस निरीक्षक कमलेश सोनटक्के आणि नवेगाव/बांध च्या ठाणेदार पोलीस निरीक्षक योगीता चाफले या दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांनी चौकशी केली त्यांना कुठेच मुलांचे अपहरण (Abduction) करणारी टोळी सक्रिय असल्या प्रकरणी तपासाची चक्रे फिरवुन दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसोबत त्या सबंधित गावात जाऊन त्या गावातील नागरिकांसोबत चर्चा केली आणि नागरिकांनी पोलीसांना सांगितले की दि.28 जुलै रोजी सायंकाळी 4:00 वाजताच्या दरम्यान सावरटोला गावात ब्लैंकेट विकणारी गाडी आली. त्या ब्लैंकेट विक्रेत्याला दाढी असल्याने गावातील मुलगी किराणा दुकानात बिस्केट घ्यायला गेली व परत येत असतांना दाढी असलेला ब्लैकेंटवाला दिसला म्हणुन मुलगी घाबरली तसेच दि.29 जुलै रोजी सकाळी 8:00 वाजताच्या दरम्यान उमरी येथील मुलगी उमरी गावाच्या वळणावर दुध डेअरी येथे दुध आणायला गेली होती.
अर्जुनी/मोरगाव तालुक्यात अपहरण करणारी टोळीच नाही
घरी परत येत असतांना त्या मार्गाने भगवा कपडे,कपाळाला टिळा,लांब दाढी व दुपट्टा घातलेला व्यक्ती गाडीत बसुन जात होता समोर बैलबंडी आडवी आल्याने त्यांनी गाडी साईडला घेतली आणि मुलगी साईडला असतांनी जागा ओली असल्याने पाय घसरुन पडली त्यामुळे गाडी वाल्याने मुलीला काही लागले तर नाही यासाठी आपल्या गाडीचा दरवाजा उघडुन मुलीकडे बघितला त्यामुळे मुलीला दाढीवाल्या बाबांकडे पाहुन भिती वाटली व मुलगी घाबरली होती.दि.30 जुलै रोजी दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांनी सबंधित मुलींना व त्यांच्या पालकांशी चर्चा करुन त्यांचा जवाब नोंदवला. सखोल चौकशी केली असता अशी कोणत्याही प्रकारची अपहरण करणारी टोळी नसल्याचे निष्पन्न झाले. नागरिकांनी अफवांवरती विश्वास ठेवु नये तसेच संशयीत आढळल्यास पोलीसांना त्याची माहिती तात्काळ द्यावी आलेल्या बातम्या निराधार असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी बोलतांनी सांगितले .