पाथरी ग्रा.प. चा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर
देशोन्नती वृत्तसंकलन
तुमसर/भंडारा (Rain water) : सध्या पावसाळा सुरू आहे. दरम्यान येथिल ग्रामपंचायत ने गावातील मान्सून पुर्व नाल्या सफाई केल्या नसल्याने २२ आगस्ट रोजी पाथरी ,येथे मुसळधार पावसाने हजेरी लावली असता सदर मुसळधार (Rain water) पावासाचे पाणी येथिल नागरीकांच्या घरात शिरले असल्याने घरातील मोल्यवान वस्तु, अन्न धान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे पाथरी ग्रामपंचायतचा (Pathari Gram Panchayat) अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला आहे.
२२ आगस्ट रोजी दुपारच्या सुमारास पाथरी, नाकाडोंगरी, आष्टी परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली. दरम्यान संपुर्ण जनजिवन विस्कळीत झाले होते. त्यात पाथरी येथिल ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सचिवाने गावांतील मान्सुनपुर्व नाल्या सफाई केल्या नसल्याने येथिल नाल्या तुंडुब भरल्या होत्या. पावसाच्या पाण्याने (Rain water) गावात सर्वत्र पुरस्थिती निर्माण झाली होती. परिणामी पावसाचे पाणी येथिल रहीवासी फलिराम कावळे, झि़गु सोनवाने, राम हरी कावळे आदी नागरिकांच्या घरात शिरले असल्याने घरातील कीत्येक मौल्यवान वस्तूचे नुकसान झाले.
घरातील अन्न, धान्य सुध्दा पाण्यात (Rain water) भिजले असल्याने संबधित नागरिकांना खाण्या पिण्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. ऐन पावसाळ्याच्या दिवसात सुध्दा येथिल ग्रामपंचायत (Pathari Gram Panchayat) पदाधिकाऱ्यांनी गावातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष करुन येथे चक्क स्वतंत्र दिनाच्या नंतर महात्मा गांधी यांच्या स्वच्छता मुलमंत्र संदेशाचे धिंडवडे उडवले असल्याने येथिल ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सचिवांचा मनमानी कारभार चव्हाट्यावर आला आहे. परिणामी नागरिकांना नुकसानाला सामोरे जावे लागले आहे.