निटूर (Latur) :- मृगजळामागे धावणारे हरीण निलंगा तालुक्यातील वनक्षेत्रात जळासाठी अर्थात पाण्यासाठी धावत आहेत आणि धावता धावता हरणाचा (Deer) मृत्यू (Death) होत आहे. वनक्षेत्रातील पानवठे कोरडेठाक असल्याने मुक्या वन्य प्राण्यांवर (wild animals) ही वेळ आली असून वनविभाग आता तरी डोळे उघडणार आहे का असा सवाल केला जात आहे. निलंगा तालुक्यातील लातूर जहीराबाद हायवे वरती बुजरूकवाडी पाटी जवळ एका हरणाचा अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये जागेवर मृत्यू झाला. या वर्षात अशा अनेक घटना संबंधित ठिकाणी घडल्या.
लातूर ते जहीराबाद महामार्गावरील बुजरूकवाडी पाटील दुर्घटना
वनविभागाच्या (Forest Department) जंगलामध्ये पाण्याचे पानवठे आहेत, पण त्यात पाणीच नसल्याने वन्य प्राण्यांना पाण्यासाठी वनक्षेत्राच्या बाहेर भटकावे लागत आहे. निलंगा केळगाव- लांबोटा वन विभागातील पाणवठे तर फुटलेलेच आहेत. वर्षात एखादा दिवस पानवटे भरून त्याचे फोटोसेशन झाले की वनविभाग निवांत झालेला दिसतो. मुके प्राणी मात्र तहानेने व्याकुळ होऊन शेत शिवारात भटकंती करीत आहेत. केळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते जावेद मुजावर हे रात्री याच मार्गे केळगाव जात असताना 7 च्या तुम्हारा रस्त्याकडेला मृत्युमुखी पडलेले हरीण दिसले. त्यांनी तात्काळ वनरक्षक सोपान बडगणे यांच्याशी संपर्क साधून झालेल्या घटनेची सविस्तर माहिती दिली. त्यानंतर वन विभागाने त्या मृत हरणाचा पंचनामा व अंत्यसंस्कार केले की नाही, याची माहिती अद्याप मिळाली नाही.