हरंगुळ रेल्वे स्टेशन परिसरात पाणीपुरीवाल्याचा खून!
लातूर (Latur) : दोन टुकार टोळ्यांच्या वादातून लातूरमध्ये अंबाजोगाई रोडवर परवा झालेल्या हाणामारीनंतर पोलिसांकडून बुधवारी मध्यरात्री शहरासह जिल्ह्यात सर्वत्र कोंबिंग ऑपरेशन (Combing Operation) राबविण्यात येत असतानाच दुसरीकडे चक्क शिवाजीनगर पोलीस ठाणे समोर एक खून पडला. तसेच दुसऱ्या दिवशी गुरुवारी रात्री पैशाच्या कारणावरून हरंगुळ रेल्वेस्थानक परिसरात एका परप्रांतीय पाणीपुरीवाल्याचा खून करण्यात आला. दरम्यान पोलिसांनी या दोन्ही खून प्रकरणातील (Case of Murder) आरोपींना तात्काळ अटक केली आहे. लातूर शहरातील गुंडागर्दीचे वातावरण वरचेवर वाढत असल्याने सूज्ञ लातूरकरांमध्ये पोलीस प्रशासनाविषयी तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
एकाचा तंबाखूवरून तर दुसऱ्याचा पैशासाठी खून; दोन्ही प्रकरणातील आरोपी जेरबंद!
लातूर शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या समोरच फुटपाथवर झोपलेल्या, एका अनोळखी समाजाच्या डोक्यात दगड मारून पूर्ण करण्यात आला. 13 मार्चला मध्यरात्री ही घटना घडली. तंबाखू देण्या-घेण्याच्या वादातून दिवसा दोघांमध्ये भांडण झाले आणि रात्री त्या रागातून हा खून झाला असा तर्क पोलिसांनी लावला आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध कुणाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तातडीने तपास यंत्रणा राबविली. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा पथकाने काही तासातच अनोळखी मयताची ओळख पटविली. त्यानंतर आरोपी देविदास शेषेराव सोनकांबळे, (वय 54 वर्ष, राहणार खाडगाव रोड, प्रकाश नगर, चंद्रोदय कॉलनी, रोड क्रमांक 5, लातूर) या आरोपीला क्रीडासंकुलच्या गेट समोरून 14 मार्च रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास जेरबंद केले. देविदास सोनकांबळे हा दिवसभर भीक मागून खातो. दुपारी तंबाखू घेण्या-देण्याच्या कारणावरून झालेल्या किरकोळ वादाचा मनात राग धरून मध्यरात्री चहाच्या टपरीसमोर फुटपाथवर झोपलेल्या प्रकाश लिंबाजी भडके (58, रा. खाडगाव रोड, लातूर) याचा डोक्यात दगड घालून खून केल्याचे आरोपीने कबूल केले असे पोलिसांनी एका पत्रकात म्हटले आहे.
कुणाची दुसरी घटना 14 मार्चला रात्रीच्या सुमारास घडली.
मनिष रुपसिंग पाल (वय 20वर्षे रा. घिलौर ता. नंदीगाव जि. जालोन राज्य उत्तर प्रदेश सध्या राहणार हरंगुळ रेल्वे स्टेशन समोर, समर्थ नगर, हरंगुळ बु.) हा हरंगुळ रेल्वे स्टेशन समोरील पाण्याच्या टाकी जवळ पाणीपुरी विक्री व्यवसाय करत होता. त्याच्याकडे पैशाची मागणी केल्यानंतर, त्याने पैसे देण्यास नकार दिल्याने, या पाणीपुरीवाल्यावर चाकूने पोटात व डाव्या हातावर वार करून त्याचा खून केला. तसेच त्याच्या जवळील मोबाईल व पैसे काढून घेण्यात आले. मयताच्या भावाने दिलेल्या, फिर्यादीवरून या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात (Police Station) गुन्हा नोंद करण्यात आला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी 24 तासांच्या आत दत्ता संजय ढोरमारे, वय 20 वर्षे, राहणार पटेल नगर लातूर व आयान अब्दुल शेख, वय 20 वर्षे, राहणार कपील नगर लातूर या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे खून प्रकरणात चौकशी केली असता, त्यांनी खून केल्याचे कबूल केले. असे पोलिसांनी याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.